AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा यशवंतराव चव्हाणांचे विचार कुठे होते?; अजितदादा गटाच्या मंत्र्याचा पवारांवर थेट हल्लाबोल

NCP Leader Anil Patil on Sharad Pawar and Loksabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेत या नेत्याने शरद पवारांना सवाल केला आहे. लोकसभा निवडणुकीबाबत ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

तेव्हा यशवंतराव चव्हाणांचे विचार कुठे होते?; अजितदादा गटाच्या मंत्र्याचा पवारांवर थेट हल्लाबोल
| Updated on: Apr 30, 2024 | 1:02 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मानतात. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालतात. शरद पवारांना शवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हटलं जातं. याचा दाखला देत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने थेट शरद पवार यांचं नाव घेत शाब्दिक हल्ला चढवला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा उल्लेख करत या नेत्याने शरद पवारांना थेट सवाल केला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

अनिल पाटील काय म्हणाले?

2014 ला भाजपला बाहेरून पाठिंबा देताना यशवंतराव चव्हाण यांचे विचार कुठे गेले होते?, असं अनिल पाटील म्हणालेत.यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या या मागणीवर टीका केली, असंही अनिल पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर पक्ष हिसकावल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. त्यावरही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. पक्ष कोणी एका व्यक्तीमुळे उभा राहत नाही. त्यात सगळ्याचं योगदान असतं, असं अनिल पाटील म्हणालेत.

बारामतीच्या लढतीवर काय म्हणाले?

बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे देशाचं लक्ष आहे. नणंद विरूद्ध भावजय अशी ही लढत होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार या राजकीय लढाईत कोण जिंकणार? याची राज्यासह देशभरात चर्चा होत आहे. यावर अनिल पाटलांनी प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास अनिल पाटलांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही अनिल पाटलांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे पूर्ण वेळ मुख्यमंत्री कधी होते ते सांगावं. जर एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते तर संजय राऊतांना कुणी विचारलं नसतं. ज्यांचे 5 खासदार आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये, असं अनिल पाटील म्हणाले.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....