AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाने काढले आदेश, काय आहे कारण

Pune News Varandha Ghat : पुण्यावरुन महाडला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहनधारकांना त्या दिवशी पर्यायी मार्गांवरुन जावे लागणार आहे.

पुणे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाने काढले आदेश, काय आहे कारण
Varandha Ghat
| Updated on: Jul 21, 2023 | 9:44 AM
Share

विनय जगताप, भोर, पुणे | 21 जुलै 2023 : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. हा घाट अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच हवामान विभागाकडून जेव्हा जेव्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहे.

काय आहे कारण

सध्या पुणे परिसरातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेकवेळा अचानक दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. तसेच वृक्ष उन्मळून पडणे, रस्ता खचून जाणे, माती वाहून जाणे हा प्रकारही होतो. यामुळे प्रशासनाने संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. वाहन धारकांना वरंधा घाट बंद झाल्यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय आहे. हा घाट वरंधा घाटापेक्षा अधिक सुरक्षित आहे.   वरंधा घाटावरुन महाडला जाण्यास कमी वेळ लागतो. यामुळे वाहन धारका या घाटाने प्रवास करतात.

वरंधा घाटाच्या मार्गावर अरुंद रस्ते आहेत. तसेच अचानक वळणे अनेक आहेत. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात या भागात अनेकदा अपघात घडतात.

कधीपर्यंत असणार हा आदेश

पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बंद असणार आहे. यासंदर्भातील आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत. यामुळे या मार्गावरुन जाताना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.

भोर तालुक्यात रस्ते खराब

पुण्यातल्या भोर तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत. खड्यांचं साम्राज्य या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. या भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक लहान, मोठे अपघातही होत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.