AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : आयएमडीने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात दोन दिवसांत किती टक्के झाला पाऊस

Rain News : राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. शुक्रवारी हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे.

Rain : आयएमडीने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात दोन दिवसांत किती टक्के झाला पाऊस
| Updated on: Jul 21, 2023 | 8:04 AM
Share

पुणे | 21 जुलै 2023 : राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळली. त्या घटनेत जीवितहानी झाली. पाऊस अजून राज्यात काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अन् यलो अलर्ट दिला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्वाचे आहे. राज्य शासनाने आपात्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा तयार ठेवली आहे.

कुठे कोणता अलर्ट

  • रेड अलर्ट : पुणे , पालघर , ठाणे ,रायगड , अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
  • आँरेज अलर्ट : मुंबई , रत्नागिरी
  • यलो अलर्ट : सिंधुदुर्ग , सातारा , नाशिक , नंदुरबार , कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोली

रत्नागिरीला पावसाचा तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा चांगला तडाखा बसला आहे. चिपळूण आणि खेडमध्ये 48 तासांत तब्बल 327 मिलीमाटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. उतर रत्नागिरीत भागात पावसाचा तडाखा जास्त आहे. पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. 19 जुलै पर्यंत राज्यात केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील धरणसाठा आता ३७ टक्क्यांवर गेला आहे.

तिसऱ्या दिवशी महामार्ग पाण्याखाली

वसईवरुन वसई फाटा महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच आहे. या भागात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु आहे. अधूनमधून जोरदार पाऊस झाला आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, आगाशी स्टेशन रोड रस्ता, नालासोपारा सेन्ट्रल पार्क, स्टेशन रोड, आचोळा, वसई सनसिटी, वसई मुख्य रस्ता, एव्हरसाईन रस्ता हे तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच गेलेले आहे.

जळगावात सातपुडा रांगेत मुसळधार

जळगाव जिल्ह्यात सातपुडा रांगेत नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रावेर शहरासह तालुक्यातील विवरे, भोकरी पाहणी केली. नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना एनडीआरएफ अन् एसडी आरएफच्या टीमला जिल्हाधिकारींनी दिल्या आहेत. एनडीआरएफची एक तर एसडीआरएफच्या दोन टीम रावेरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.