AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : आयएमडीने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात दोन दिवसांत किती टक्के झाला पाऊस

Rain News : राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. शुक्रवारी हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे.

Rain : आयएमडीने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात दोन दिवसांत किती टक्के झाला पाऊस
| Updated on: Jul 21, 2023 | 8:04 AM
Share

पुणे | 21 जुलै 2023 : राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळली. त्या घटनेत जीवितहानी झाली. पाऊस अजून राज्यात काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अन् यलो अलर्ट दिला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्वाचे आहे. राज्य शासनाने आपात्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा तयार ठेवली आहे.

कुठे कोणता अलर्ट

  • रेड अलर्ट : पुणे , पालघर , ठाणे ,रायगड , अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
  • आँरेज अलर्ट : मुंबई , रत्नागिरी
  • यलो अलर्ट : सिंधुदुर्ग , सातारा , नाशिक , नंदुरबार , कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोली

रत्नागिरीला पावसाचा तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा चांगला तडाखा बसला आहे. चिपळूण आणि खेडमध्ये 48 तासांत तब्बल 327 मिलीमाटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. उतर रत्नागिरीत भागात पावसाचा तडाखा जास्त आहे. पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. 19 जुलै पर्यंत राज्यात केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील धरणसाठा आता ३७ टक्क्यांवर गेला आहे.

तिसऱ्या दिवशी महामार्ग पाण्याखाली

वसईवरुन वसई फाटा महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच आहे. या भागात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु आहे. अधूनमधून जोरदार पाऊस झाला आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, आगाशी स्टेशन रोड रस्ता, नालासोपारा सेन्ट्रल पार्क, स्टेशन रोड, आचोळा, वसई सनसिटी, वसई मुख्य रस्ता, एव्हरसाईन रस्ता हे तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच गेलेले आहे.

जळगावात सातपुडा रांगेत मुसळधार

जळगाव जिल्ह्यात सातपुडा रांगेत नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रावेर शहरासह तालुक्यातील विवरे, भोकरी पाहणी केली. नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना एनडीआरएफ अन् एसडी आरएफच्या टीमला जिल्हाधिकारींनी दिल्या आहेत. एनडीआरएफची एक तर एसडीआरएफच्या दोन टीम रावेरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.