AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारला शेतकऱ्यांऐवजी नबाब मालिकांचा जावई, शाहरुखचं पोरगं कसं सुटेल यामध्ये स्वारस्य, विनायक मेटेंचा आरोप

दोन महिने झाले तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने साधी बैठकही बोलावली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

ठाकरे सरकारला शेतकऱ्यांऐवजी नबाब मालिकांचा जावई, शाहरुखचं पोरगं कसं सुटेल यामध्ये स्वारस्य, विनायक मेटेंचा आरोप
विनायक मेटे
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 6:37 PM
Share

पुणे: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकार आणि प्रशासनाकडून झालेलं दुर्लक्ष, आर्यन खान प्रकरणाला देण्यात आलेलं महत्त्व यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. विनायक मेटे यांनी फक्त बीड जिल्ह्यात 1 जानेवारी पासून आजच्या तारखेपर्यत शासकीय आकडेवारी नुसार 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर 70 ते 75 शेतकरी आत्महत्येची नोंदचं प्रशासनाकडे नोंद झालेली नाही. शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेणाऱ्यांसाठी ही लाज आणणारी बाब आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सरकारी अधिकारी, नेते कोणीही गेले नाहीत. जनाची नाही तर मनाचीही लाज सरकारला वाटत नाही. मुर्दाड मनाचं हे सरकार असून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे, असं विनायक मेटे म्हणाले. सरकारला शेतकऱ्यांच काही देणं घेणं नाही, पण नबाब मालिकांचा जावई कसा सुटेल, शाहरूखच पोरगं कस सुटेल? यातच सरकारला स्वारस्य आहे. दिवाळीत जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर दिवाळीनंतर शिवसंग्रामचा पहिला मोर्चा बीड जिल्ह्यात सरकार विरोधात निघेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

शरद पवारांना मराठा आरक्षणावर बोलायला वेळ नाही

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. दोन महिने झाले तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने साधी बैठकही बोलावली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सरकार चालवणाऱ्याला शरद पवारांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. पवारांना बाकी सगळ्या विषयांवर बोलायला वेळ आहे.

शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायला वेळ नाही. शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार, किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं यावर अद्याप निर्णय नाही, सर्व कार्यकर्त्यांवर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असंही मेटे म्हणाले. आर्यन खान व समीर वानखडे प्रकरणात सगळे प्रश्न बाजूला ठेऊन जे सुरु आहे ते खूप खालच्या पातळीवरच लक्षण आहे, अशी टीका देखील विनायक मेटे यांनी केली.

इतर बातम्या:

चेंबूरमधील ‘तो’ व्यक्ती मित्रच नाही तर आमचा कार्यकर्ता, नवाब मलिकांच्या आरोपांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर

अरे, बाबा तुम्हाला कोणी अडवले? या धमक्या द्यायचं बंद करा, जे करायचं ते करा; चंद्रकांत पाटलांचं मलिक यांना आव्हान Vinayak Mete accused Uddhav Thackeray Government not solve issue of farmers

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.