AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे वागणं बरं नव्हं : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, मुंबई, कोकणात पावसाचा अंदाज; विचित्र वातावरणामुळे गारठा वाढणार

सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हे वागणं बरं नव्हं : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, मुंबई, कोकणात पावसाचा अंदाज; विचित्र वातावरणामुळे गारठा वाढणार
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 11:37 AM
Share

नाशिकः उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असून पुढचे दोन दिवस गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे नाशिकचा पारा 12.9 पर्यंत खाली घसरल्याची नोंद नाशिकच्या हवामान केंद्रात झाली आहे. त्यातच सध्या तयार झालेल्या विचित्र वातावरणामुळे हा गारठा आणखी जास्त वाढू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

तीव्र कमी दाबाचा पट्टा

श्रीनिवास औंधकर म्हणाले की, सध्या उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढणार आहे. बोचरी थंडी आणि पाऊस असे विचित्र वातावरण या काळात राहणार आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होत आहे. हे वादळ कोलकात्याकडे जाईल. त्यामुळे आपल्या इकडलेही वातावरण निवळेल आणि पुन्हा थंडी वाढेल, असा अंदाज औंधकर यांनी वर्तवला.

थंडीचे उशिरा आगमन

नाशिकमध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे आगमन होते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पावासाने नाशिकरांच्या नाकी नऊ आणले. त्यात गोदावरीला नदीला आलेले चार पूर. मनमाड, नांदगावमध्ये झालेली भीषण अतिवृष्टी. अगदी दिवाळीतही नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली. आता अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या साऱ्या हवामान बदलामुळे यंदा डिसेंबर सुरू होण्यापूर्वी थंडीचे आगमन झाले आहे. येणाऱ्या काळात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.

सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढण्याची शक्यता आहे. – श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद

इतर बातम्याः

Nashik | महापालिका निवडणुकीचा कच्चा प्रभागरचना आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला; 15 डिसेंबरनंतर कार्यक्रम जाहीर होणार

साहित्य संमेलनावर ओमिक्रॉनचे सावट, लस घेतली तरच प्रवेश; दक्षिण आफ्रिकेत गेलेले खेळाडू कोरोना निगेटीव्ह

नाशिककरांना 2 तासांत गाठता येणार सुरत, ग्रीनफील्ड महामार्गाने जिल्ह्याचे रूपडे बदलणार!

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.