AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : कशाला ठेवता शिवाजी महाराजांचे पुतळे? फक्त डेकोरेशनसाठी?; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबाबत चिंता व्यक्त केली. बाहेरच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राकडे, विकत घेणारी माणसं म्हणून पाहिले जात असल्याचे सांगत त्यांनी तरुणाईला जागृत राहण्याचा आवाहन केले. महाराष्ट्राची जमीन, भाषा आणि स्वाभिमान यांचे संरक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Raj Thackrey : कशाला ठेवता शिवाजी महाराजांचे पुतळे? फक्त डेकोरेशनसाठी?; राज ठाकरेंचा संतप्त सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: social media
| Updated on: Aug 02, 2025 | 1:40 PM
Share

तब्बल सव्वाशे वर्षं हिंद प्रांतावर राज्य करणारा आपाल महाराष्ट्र आह, मात्र आज आपल्या राज्याबद्दल बाहेर काय बोललं जात माहीत आहे का ? ही विकत घेणारी माणसं असं बोललं जातं. ही आपली प्रतिमा आहे असं म्हणत आपण शिवाजी महाराजांचे पुतळे कशासठी ठेवतो मग, फक्त डेकोरेशनसाठी? असा संतप्त सवाल विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला जागं होण्याची हाक दिली, तुम्ही जिवंत असलं पाहिजे. तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये. कुणाच्या आहारी जाऊ नका असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली. या मेळाव्यातील भाषणादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विविध विषयांना हात घालत सडेतोड भाषण केलं. तसंच त्यांनी सरकारला उद्देशून आव्हान देत त्यांनाही ललकारलं.

तेव्हाच अंगावर येऊ

महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन भरवलं जात असल्याची चर्चा आहे, त्यावरू राजल ठाकरेंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. हे काय चालू आहे. केवळ गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी. त्यांची भांडणं व्हावी. त्यातून मतं कशी काढू शकतो, त्यासाठी काय काय करता येईल, यासाठीचे उद्योग आहेत. त्यांना वाटलं राज ठाकरे, संजय राऊत आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होऊ. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते करणार नाही, बिलकूल करणार नाही. जेव्हा समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय तेव्हा अंगावरच येऊ असा इशारा राज यांनी दिला.

कान बंद ठेवू नका. डोळेबंद ठेवू नका, आजूबाजूला काय चाललंय त्याकडे लक्ष द्या. तरुण आणि तरुणींनो लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात. तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय. तुमची भाषा निघून जाईल. कालांतराने पश्चात्तापाचा हात कपाळाला लागेल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. पैसे कमावले पाहिजे,. कुटुंब उभं केलं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून नाही असा सल्लाही त्यांनी महाराष्ट्रातील तरूणाईला दिला.

जेव्हा स्वाभिमान विकला जातो तेव्हा उरतात जिवंत प्रेतं

महाराष्ट्रातील जनतेला जिवंत राहण्याची हाक देतानाच राज ठाकरे यांनी त्यांना ठणकावलंही. ” बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल काय बोलतात माहीत आहे का. ही विकत घेणारी माणसं असं बोललं जातं. ही आपली प्रतिमा आहे. सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणारा महाराष्ट्र आहे. तो विकला जातो. माणसं विकली जातात. आपली जमीन आणि भाषा सोडतो. कशाला पुतळे ठेवतो शिवाजी महाराजांचे. डेकोरेशन म्हणून?” असा खड़ा सवाल त्यांनी विचारला. फारसी शब्द असू नये म्हणून स्वताचा राजकोष काढणारा माणूस, ज्याने मराठीत बोलायाला सांगितलं त्या महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमान आणि स्वत्व घालवत आहोत. जेव्हा स्वाभिमावन विकला जातो तेव्हा उरतात जिवंत प्रेतं असं ते म्हणाले. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे. त्यामुळे तुम्ही जिवंत असलं पाहिजे, तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये. कुणाच्या आहारी जाऊ नका असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.