AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते, राऊतांच्या विधानावर pankaja munde यांची सूचक प्रतिक्रिया

राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे, असं सूचक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केलं. त्या बीड (beed) येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात युतीबाबतचं मोठं विधान केलं होतं.

राजकारणात कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते, राऊतांच्या विधानावर pankaja munde यांची सूचक प्रतिक्रिया
राजकारणात कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते, राऊतांच्या विधानावर pankaja munde यांची सूचक प्रतिक्रियाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 4:27 PM
Share

बीड: संजय राऊत (sanjay raut) यांनी युतीबाबत केलेल्या विधानावर मी टिप्पणी करू शकणार नाही. पण त्यांच्या भावनेला पक्षातील पक्षाध्यक्ष आणि पक्षातील निर्णय घेणारे इतर नेतेच उत्तर देतील, असं सांगतानाच राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे, असं सूचक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केलं. त्या बीड (beed) येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात युतीबाबतचं मोठं विधान केलं होतं. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखाद्या भूमिकेवरून शिवसेना माघार घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं आहे. या मेळाव्यात त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. बीडच्या मुद्द्यावरून माझी कशाला बदनामी करता? असा सवालच त्यांनी धनंजय मुंडे यांना केला.

पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदाम इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. यानिमित्ताने विकास कामांचे उदघाटन, विविध परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळाव्यास त्यांनी संबोधित केले. राजकारणात वैयक्तिक वैर नसावे. हे नवीन पिढी शिकली नाही. एखाद्यावर चौकशी लावू शकतो, पण असा नेता राजकारणात दीर्घकाळ टिकत नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचं कार्याचं कौतुक केलं.

राजकारणात सर्कस सुरू

महाराष्ट्रातील विद्यार्थी हे यशवंतरावांचे देणे लागतात. आज राज्यात गुणांची खाण असणाऱ्या नेत्यांची संख्या कमी आहे. भविष्यात दुर्गुणांची खाण असलेले नेतेच महत्त्वाचे वाटतील. युद्ध जिंकणे आणि हारणे हे खरे राजकारण नाही. लोकांची मने जिंकली पाहिजेत. सध्या राजकारणात सर्कस सुरू पाहायला मिळतेय. राज्य करताना सात्विकपणे केलं पाहिजे आणि युद्ध करताना पराक्रमाने केले पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

माझा संघर्ष प्रवृत्ती बदलण्यासाठी

महिला सत्संगाला जातात. मी पण सत्संग ऐकते. मी रामकथा ऐकल्या. त्यात चांगल्या लोकांना त्रास होतो. ज्याला वनवास, त्रास आहे, त्यालाच इतिहास रचायला मिळतो. माझा संघर्ष स्वतःसाठी नव्हता केवळ प्रवृत्ती बदलण्यासाठी होता. मोदींच्या नेतृत्त्वात सायकलवरुन जाणाऱ्या नेत्यांना मंत्री केले. मी जिल्हा परिषद एवढी मोठी केली पण एकतर काम आजच्या सत्ताधाऱ्यांनी केले का?, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

संबंधित बातम्या:

ST Strike : एस.टी. कर्मचाऱ्यांवरच्या कारवाईला स्थगिती, कोर्टात नेमकं काय घडलं? सदावर्तेंनी 10 मोठे मुद्दे मांडले

Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Tax: मुंबईकरांसाठी मोठी घोषणा, अकृषी कराला स्थगिती

Follow Us
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?