AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : जामनेरच्या मावशीबाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का? तुम्ही काय केलं? संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं

संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या ६ खासदारांच्या कथित बंडखोरीवर महाजन यांनी केलेल्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी महाजन यांना 'जामनेरच्या मावशीबाई' संबोधत, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले याची आठवण करून दिली. तसेच, शिवसेनेतील 'फुटणे' नसून 'विकणे' आहे, असे स्पष्ट केले.

Sanjay Raut : जामनेरच्या मावशीबाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का? तुम्ही काय केलं? संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं
संजय राऊत यांची घणाघाती टीका
| Updated on: Jun 19, 2026 | 11:14 AM
Share

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली असून यावर विविध राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी यावरून खोचक टीका केली होती. संजय राऊत बोलले की फोडून काढू. पण मग फोडून काढायला सोबत माणसं तर पाहिजेत ना. आता पहिले दिवस गेले. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मागे-मागे फिरता,’ अशी टीका महाजन यांनी केली होती. मात्र या टीकेमुळे राऊत चांगलेच भडकले असून त्यांनी महाजनांना चोख प्रत्युत्तर दिलं. माध्यमांशी बोलताना त्यांन महजानांवर टीका केली. जामनेरच्या या मावशी बाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का आहे. या देशाला काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही काय केलं? असा सावलाच राऊत यांनी थेट विचारला.

जामनेरच्या मावशीबाई म्हणत टीकास्त्र

काल ते जळगावच्या ,जामनेरच्या  मावशीबाई सांगत होते की शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर बसल्यामुळे हे सहा लोकं सोडून गेले. अरे मावशे… त्या तमाशातील मावश्या असतात ना… अशा भाजपमधल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आहे, आम्ही आहोत. त्यांच्याच मदतीने हे सहा लोकं, हे खासदार निवडून आले. आले ना ? तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं महाविकास आघाडीत काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे सहा लोकांना माहीत होतं ना,मग आता मोठं सांगत आहेत तुम्ही. जामनेरच्या या मावशी बाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का आहे. या देशाला काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही काय केलं? असा खडा सवाल राऊत यांनी विचारला. या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेसचे लोकं तुरुंगात गेले. क्रांतीकारक झाले. देशासाठी प्राणाचा त्याग केला असं कोणी आहे का भाजपमध्ये. आम्हाला सांगा. उगाच नावं ठेवू नका, असंही राऊतांनी सुनावलं.

याला फुटणं नव्हे विकणं म्हणतात

गेल्या 4 वर्षआंत शिवसेना 2 वेळा फुटली, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता राऊतांनी स्पष्ट उत्तर दिलं. शिवसेनेतले हे जे बंडखोर खासदार आहेत ना, किंवा आत्ता जे सुरू आहे ना, त्याला मी शिवसेना फुटली असं म्हणत नाही. माणूस फुटतो कधी, एक वैचारिक वारसा घेऊन फुटतो. विचारासाठी बाहेर पडतो. तू स्वतला विकण्यासाठी बाजारात उभा राहतो आणि तुला बाजारात विकत घेतलं तर त्याला फुटणं नाही म्हणत, असं राऊत म्हणाले. त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे सहा लोकं दोन दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले. राजकीय गोलपिठ्यात आणि त्यांनी स्वतची बोली लावली. ती बोली आहे, त्यांच्या बोलीवर विकत घेतलं गेलं, असं पुढे राऊत यांनी नमूद केलं. कोणता महान विचार घेऊन फुटले. काय विचार आहे. एकाला तरी विचारा. त्यांना शिवसेनेचा काय विचार माहीत आहे का असा सवालही राऊत यांनी विचारला.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला