AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यंदाची होळी साजरी केली नाही. या वेळी हजारो वर्षांची परंपरा त्यामुळे खंडीत झाली आहे.

संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?
| Updated on: Mar 14, 2025 | 5:28 PM
Share

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राची वाट आता बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होऊ लागली आहे. आता मस्साजोग ग्रामस्थांनी यंदाचा होळी सण साजरा केला नाही. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा करणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाची सुई मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते वाल्मीक कराड यांच्या दिशेने वळली होती. त्यानंतर या प्रकरणात ९ ते १० आरोपींना अटक करण्यात आली होती. वाल्मीक कराड या प्रकरणात पुणे सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला. त्यानंतर या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखर अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आठ व्हिडीओ आणि १५ फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या फोटोत ही हत्या किची निर्घृण आणि क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

संतापाचा उद्रेक उडाला

संतोष देशमुख यांच्या मृतदेहांची अक्षरश: विटंबना करतानाचे फोटो काढण्यात आले होते. हा फोटो व्हायलर करण्यात आले. त्यामुळे संतापाचा उद्रेक उडाला. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला उभारला गेला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात मस्साजोगमध्ये यंदा होळी आणि धुळवड साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे. इतकेच या पुढे जोपपर्यंत सर्व आरोपींना फाशी होत नाही तर मस्साजोगमध्ये कोणताच सण साजरा न करण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली आहे.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...