.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्याच्या आशेनं पीक घेतलं, आणि सगळं मातीत गेलं; म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीसाठी…

शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पिकांच्या नुकसानीचे भरपाई देण्याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

उद्याच्या आशेनं पीक घेतलं, आणि सगळं मातीत गेलं; म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीसाठी...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 20, 2023 | 11:07 PM
Share

सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर असल्याने आता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच आज शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शासकीय यंत्रणाही कामाला लागली असून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यात मागील 4 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे 3 तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये वाई, खटाव, माण तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 483.75 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारी, गहू , कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे.

तर या नुकसानीबाबत दोन दिवसांपासून शेती विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पिकांच्या नुकसानीचे भरपाई देण्याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात एकूण 483.75 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानीमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे वाई, माण, खटाव या तालुक्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहेत.

अवकाळी पावसामुळे वाई तालुक्यातील 470.75 हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तर खटाव तालुक्यात 10.70 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून खटाव तालुक्यातील कांदा, आले, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

त्याच प्रमाणे माण तालुक्यातील 2.40 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून याही तालुक्यातील ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर