AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्याच्या आशेनं पीक घेतलं, आणि सगळं मातीत गेलं; म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीसाठी…

शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पिकांच्या नुकसानीचे भरपाई देण्याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

उद्याच्या आशेनं पीक घेतलं, आणि सगळं मातीत गेलं; म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीसाठी...
| Edited By: | Updated on: Mar 20, 2023 | 11:07 PM
Share

सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर असल्याने आता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच आज शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शासकीय यंत्रणाही कामाला लागली असून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यात मागील 4 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे 3 तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये वाई, खटाव, माण तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 483.75 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारी, गहू , कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे.

तर या नुकसानीबाबत दोन दिवसांपासून शेती विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पिकांच्या नुकसानीचे भरपाई देण्याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात एकूण 483.75 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानीमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे वाई, माण, खटाव या तालुक्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहेत.

अवकाळी पावसामुळे वाई तालुक्यातील 470.75 हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तर खटाव तालुक्यात 10.70 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून खटाव तालुक्यातील कांदा, आले, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

त्याच प्रमाणे माण तालुक्यातील 2.40 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून याही तालुक्यातील ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.