AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपसोबत शरद पवारांनाच युती करायची होती पण…, 2014 ला काय घडलं? प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपसोबत शरद पवारांनाच युती करायची होती पण..., 2014 ला काय घडलं? प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2025 | 9:28 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते.  2014 मध्येच ठरलं होतं की, भाजपने शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा आणि सत्तेत यायचं, मोठ्या साहेबांची (शरद पवार) यांची आणि आमची खूप दिवसापासूनची भाजपसोबत यायची इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? 

प्रफुल्ल पटेल यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) यांची देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये बोलताना केला आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती, आणि आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले. मात्र, पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो. तुम्ही पुढे निघून गेले असे म्हणत त्यांनी यावेळी मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील खोचक टोला लगावला आहे.

राहुल गांधींवर हल्लाबोल 

राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप केला आणि त्याच्यानंतर बिहारमधून आज त्यांनी वोट अधिकार यात्रा सुरू केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर जाग आली आणि ते वोट चोरीचा आरोप करत आहेत. निवडणूक होती तेव्हा असा कोणीही आरोप केला नाही. महाराष्ट्रामध्ये देखील एकाही पक्षाने त्यावेळी तक्रार केली नाही, की वोट वाढलेत म्हणून. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची वोट चोरी आणि बूथ कॅप्चर होऊ शकत नाही, असं मी सांगू शकतो असं यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.