AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपसोबत शरद पवारांनाच युती करायची होती पण…, 2014 ला काय घडलं? प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपसोबत शरद पवारांनाच युती करायची होती पण..., 2014 ला काय घडलं? प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2025 | 9:28 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते.  2014 मध्येच ठरलं होतं की, भाजपने शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा आणि सत्तेत यायचं, मोठ्या साहेबांची (शरद पवार) यांची आणि आमची खूप दिवसापासूनची भाजपसोबत यायची इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? 

प्रफुल्ल पटेल यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) यांची देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये बोलताना केला आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती, आणि आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले. मात्र, पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो. तुम्ही पुढे निघून गेले असे म्हणत त्यांनी यावेळी मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील खोचक टोला लगावला आहे.

राहुल गांधींवर हल्लाबोल 

राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप केला आणि त्याच्यानंतर बिहारमधून आज त्यांनी वोट अधिकार यात्रा सुरू केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर जाग आली आणि ते वोट चोरीचा आरोप करत आहेत. निवडणूक होती तेव्हा असा कोणीही आरोप केला नाही. महाराष्ट्रामध्ये देखील एकाही पक्षाने त्यावेळी तक्रार केली नाही, की वोट वाढलेत म्हणून. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची वोट चोरी आणि बूथ कॅप्चर होऊ शकत नाही, असं मी सांगू शकतो असं यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत