AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांची मागणी

थोडी जरी नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही राऊतांनी केली. देशाचे गृहमंत्री अत्यंत अपयशी ठरले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

अमित शाह यांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांची मागणी
संजय राऊतांचे गृहमंत्री अमित शाहांवर टीकास्त्र
| Edited By: | Updated on: Jul 17, 2024 | 4:02 PM
Share

नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंत किमान ४० जवानांच्या हत्या झाल्या आहेत. त्यांचं बलिदान आहे मला मान्य आहे, पण मी त्यांना हत्या म्हणतोय. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या हत्यांना जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. थोडी जरी नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही राऊतांनी केली. देशाचे गृहमंत्री अत्यंत अपयशी ठरले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या क्षणीच काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला. तीच विटी, तोच दांडू, तेच गृहमंत्री. जे आधी ५ वर्ष पूर्णपणे अपयशी ठरले. तेच संरक्षणमंत्री, राजनाथ सिंह , त्यांच्याकडून ठोस कारवाई झाली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धूमाकूळ घातला आहे. आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे फक्त हात चोळत बसले आहे.

अमित शाह राजकारणात व्यस्त

अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असूनही देशातील निवडणुका, इतर उद्योग, धमक्या देणं यात व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शाह हे आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. आपल्या देशातील जवानांची हत्या करणाऱ्यांना त्यांनी दुश्मन समजलं पाहिजे.

देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजले पाहिजे. अमित शहा यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठी लावली. ती ताकद जम्मू कश्मीरमध्ये मणिपूरमध्ये देशातल्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी शंकराचार्यांवरही भाष्य केलं. शंकराचार्यांचं म्हणणं आहे की, धर्मामध्ये राजकीय हस्तक्षेप नको. आम्ही देखील राजकीय भाष्य करणं बंद करू. हिंदू धर्मामध्ये विश्वासघाताला कुठेही स्थान नाही. हिंदू धर्मावर विश्वासघात करत असेल आणि हिंदू धर्माबद्दल कोण भाष्य करत असेल तर हे राजकारण करू नका, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.