AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असतं तर….

केंद्रातील सरकारने एक पाउल मागे घेतले असते तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे.

हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असतं तर....
| Edited By: | Updated on: Jan 26, 2021 | 6:57 AM
Share

मुंबई : आज 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. पण कोरोनाच्या या जीवघेण्या संसर्गामुळे आजच्या दिवसावरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील सरकारने एक पाउल मागे घेतले असते तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. (shivsena saamana editorial on republic day of india farmers protest and central government)

‘नोटाबंदी, जीएसटी आणि लाँकडाउन यामुळे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. रशियासारख्या पोलादी देशातील जनताही तेथील राजवटीच्या विरोधात माँस्कोच्या रस्त्यावर उतरलीच, हे समजुन घ्यायला हवे. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्यराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत. हे चित्र बरे नाही, उद्या हा वणवा आणखीही पसरु शकतो. हे खरेच प्रजासत्ताक आहे का ?’ असा थेट सवाल करत कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून केंद्राच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होणार आहे. पण यावरही कोरोनाचं सावट असणार आहे. एकीकडे चीनच्या कुरापतींचं सावट असणार आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा आक्रोष आणि तणावदेखील असणार आहे. यामुळे दिल्लीच्या सोहळ्यावर याचा मोठा परिणाम जाणवेल असं सामनातून लिहिण्यात आलं आहे. यावेळी सामनातून कोरोनामुळे आजच्या कार्यक्रमावर होणाऱ्या परिणामांवरही लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्या पद्धतीने कोरोनाचा परिणाम अद्याप कायम आहे. तसेच ज्या जनतेचे हे ‘प्रजासत्ताक’ आहे त्या जनतेचे अनेक प्रश्न 72 व्या प्रजासत्ताक दिनीही कायमच आहेत. मागील सात दशकांत देशाची प्रगती नक्कीच झाली. त्या प्रगतीचे लाभ जनतेलाही झालेच, पण ते किती लोकांना झाले? कोणत्या वर्गाला झाले? असा थेट सवाल शिवसेनेकडून केंद्राला विचारण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावरही टीका करण्यात आली आहे. ‘‘करोडपतीं’चीही संख्या वाढली, पण गरीब अधिक गरीब झाला हेदेखील खरेच. देशातील शेतकरी आणि सामान्य जनता जेथे सुखी आणि सुरक्षित असते तो देश खरा प्रजासत्ताक म्हणता येतो. आपल्या देशाला खरेच तसे म्हणता येईल का? पुन्हा या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी द्यायची ते नेमके अशा प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. त्यांच्या ‘मन की बात’मध्ये हे ज्वलंत मुद्दे येत नाहीत.’ अशी टीका करण्यात आली आहे. (shivsena saamana editorial on republic day of india farmers protest and central government)

संबंधित बातम्या –

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ; व्हिडीओ पाहिलात का?

Padma Awards | पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान

Republic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज

(shivsena saamana editorial on republic day of india farmers protest and central government)

Follow Us
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....