AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार

कल्याणमध्ये सहा महिन्यांपूर्वी एका दीड वर्षाच्या चिमकुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, आपल्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक झालेला नसून निष्काळजीपणामुळे झाला आहे, असा आरोप या मुलीच्या पालकांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार
दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 2:10 PM
Share

कल्याण: कल्याणमध्ये (kalyan) सहा महिन्यांपूर्वी एका दीड वर्षाच्या चिमकुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, आपल्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक झालेला नसून निष्काळजीपणामुळे झाला आहे, असा आरोप या मुलीच्या पालकांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मीडियानेही हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. मात्र, मुलीचं दफन करण्यात आल्याने डॉक्टरांवर (doctor ) गुन्हा दाखल करणं कठिण होऊन बसलं होतं. पोलीस ठाण्यात (police station) अनेकदा खेटा मारूनही गुन्हा दाखल होत नव्हात. मात्र, तरीही या कुटुंबाने चौकशीचा तगदा लावला आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्यांच्या या प्रयत्नांना राजकीय बळही मिळालं. त्यानंतर अखेर सहा महिन्यांनी या चिमुकलीच्या हाडाचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातून या चिमुकलीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला की डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने झाला याचं सत्यबाहेर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अवघ्या कल्याणवासियांचे लक्ष लागले आहे.

कल्याण पूर्व भागातील नवी गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा सहा महिन्यांपूर्वी अचानक आजारी पडली होती. आई वडिलांनी तिला सूचकनाका येथील डॉ. आलाम यांच्या क्लिनिक्समध्ये उपचारासाठी नेले होते. तेव्हा डॉक्टरांनी नेहाला तपासून औषधे दिली. पण काही तासानंतर नेहाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप साहानी कुटुंबाने केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मात्र, मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला. दफन करण्यापूर्वी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते. कुटुंबियांच्या आरोपाला त्यावेळी आधार नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा दाखल करण्याचे आव्हान होते. परंतू कुटुंबियांनी हे प्रकरण लावून धरले. भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी या कुटुंबियांना मदत केली. कुटुंबियांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने संबंधित डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी या प्रकरणी तपास सुरु केला. तपास सुरु असताना दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणून तपास अधिकारी गोडे नायब तहसीलदार सुषमा बांगर आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली दफन करण्यात आलेल्या मुलीची काही हाडे बाहेर काढण्यात आली. ती तपासाकरीता कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहेत. लॅबचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

आता तरी न्याय मिळेल

मुलीचे हाडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याने पीडीत कुटुंबियांनी आता तरी न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. तर, या प्रकरणी तपास सुरु आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, असं कल्याण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Pune crime | पुणं हादरलं ! ‘तू माझ्याशी बोलत का नाही’, असे म्हणत एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर जीवघेणा हल्ला, आठवड्यातील दुसरी घटना

नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले; वर्षभरात अपघातात 207 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या उपाययोजना काय?

Accident | अॅक्टिव्हा गाडी घेऊन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी गेली; वणी येथील रस्त्यात चायनीज मांजाने चिरडले

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली