AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने काय परिस्थिती ओढावलीय, अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही, सुन्न करणारी घटना

गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांच्या अस्थी स्मशानभुमीत तशाच पडून राहिल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अस्थी घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत कोणीच आले नसल्यामुळे या अस्थींचे आता काय करायचे असा प्रश्न महापालिका कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

कोरोनाने काय परिस्थिती ओढावलीय, अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही, सुन्न करणारी घटना
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अस्थी घेऊन जायला नातेवाईक आले नाहीत पण स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मात्र अस्थी जतन करुन ठेवल्या आहेत.
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 8:54 AM
Share

ठाणे : गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांच्या अस्थी स्मशानभुमीत तशाच पडून राहिल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अस्थी घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत कोणीच आले नसल्यामुळे या अस्थींचे आता काय करायचे असा प्रश्न महापालिका कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही

कोरोनाने अनेक सामाजिक समस्या निर्माण केल्या आहेत परंतु एका विचित्र सामाजिक समस्येवर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले की मृत व्यक्तीचे नातेवाईक दुसर्‍या दिवशी स्मशानभुमीतून अस्थी गोळा करतात आणि नंतर त्याचे विधीपूर्वक विसर्जन करत असतात. निधन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी विसर्जनाला फारच महत्त्व आहे. परंतु गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांच्या अस्थी स्मशानभुमीत तशाच पडून राहिल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अस्थी घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत कोणीच आले नसल्यामुळे या अस्थींचे आता काय करायचे असा प्रश्न महापालिका कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

कोरोनाने मृत्यू, मरणानंतरही परवड

कोरोनाच्या पहिल्या लाटेची नागरिकांनी मोठीच धास्ती घेतली होती. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाहीत. सरकारी अथवा महापालिका कर्मचारीच ते मृतदेह स्मशानभुमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असतात. मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराच्या वेळी दूरवरच उभे केले जात होते. काही प्रसंगी तर अशा मृत व्यक्तींचे नातेवाईकही स्मशानभुमीत आलेले नाहीत. भाईंदर पश्चिम येथील स्मशानभुमीत असे अनेक कोरोनाचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले आहेत. त्यामुळे त्या मृतदेहांच्या अस्थी नेण्यासाठी कोणीही आलेले नाही. कोरोनात संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याचे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या अस्थींवर दावा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.

स्मशानभुमीतील कर्मचार्‍यांकडून अस्थींचं जतन

अशा दावा न करण्यात आलेल्या अस्थी स्मशानभुमीतील कर्मचार्‍यांनी व्यवस्थित जतन करुन ठेवल्या आहेत. या अस्थी कोणाच्या आहेत त्या मृतदेहाच्या नावाचाही अस्थीकलशावर उल्लेख करण्यात आला आहे. परंतू आजपर्यंत त्या नेण्यासाठी कोणीही आलेले नाही. काही अस्थी तर गेल्यावर्षी मे महिन्यातील आहेत तर काहींच्या नावाचा उल्लेखही आता पुसट होऊ लागला आहे. काही वेळा मृतदेहासोबत असलेल्या व्यक्तींनी अस्थींचे परस्पर विसर्जन करायला सांगितल्यामुळे त्यांचे विसर्जनही कर्मचार्‍यांनी केले आहे. परंतू ज्या अस्थींवर कोणी दावाच केला नाही त्यांचा आता काय करायचे असा प्रश्न या कर्मचार्‍यांपुढे उभा ठाकला आहे.

हे ही वाचा :

आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंची एन्ट्री, धक्कादायक गौप्यस्फोट करत पाच लाखांच्या ऑफरचा दावा

‘आर्यन खान प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी मला पाच लाखांची ऑफर’, हॅकर मनिष भंगाळेचा खळबळजनक दावा

समीर वानखेडेंची तपास अधिकारी म्हणून उचलबांगडी होणार? NCB चे वरिष्ठ म्हणाले, तपास पुढे जाऊ द्या

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.