AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान ! मुंबईला “या” रस्त्याने जाणार असाल तर एकदा ही बातमी वाचाच…

दोन वर्षापूर्वी हाच रस्ता पूर्ण खचला होता. आताही तीच परिस्थिती उद्भवली असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

सावधान ! मुंबईला या रस्त्याने जाणार असाल तर एकदा ही बातमी वाचाच...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 20, 2022 | 3:32 PM
Share

नाशिक : आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार (Rain) पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये (Nashik) तर अक्षरशः मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहे. इतकंच काय तर घरं कोसळून जीवित हानी देखील झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाने अक्षरशः कहर केल्याचे बोललं जात आहे. अशातच आता नाशिकहून मुंबईकडे (Mumbai) जाणारा महामार्ग देखील कसारा घाटात खचला आहे. दरवर्षी अशाच स्वरूपाचा रस्ता खचत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन असलेल्या मुख्य रस्त्यालाच तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 असलेल्या मुख्य महामर्गला अक्षरशः तडे गेले आहे.

कसारा घाटातील हा रस्ता खचण्याच्या मार्गावर असून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन वर्षापूर्वी हाच रस्ता पूर्ण खचला होता. आताही तीच परिस्थिती उद्भवली असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन नेमकं दोन वर्षांपासून काय करताय असा हा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे.

दरम्यान 10 ते 20 फूट खोल या भेगा असून ऐन दरीच्या तोंडावर असलेल्या रिटेनिंग वॉलला जोडून हा रस्ता खचल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईहून नाशिकला जाणारा कसारा घाटातील रस्ता 10 दिवस बंद करण्याचा निर्णय हायवे अथोरिटीनं घेतला असून काम प्रगतीपथावर आहे.

पावसामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.