AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस्थान करणारे कटप्रमुख, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथील दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केली की येणाऱ्या निवडणुकीत काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थात भगवा फडकवा. आपल्यातील मतभेद विसरा आणि कामाला लागा असा आदेशच त्यांनी यावेळी दिला.

हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस्थान करणारे कटप्रमुख, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
eknath shinde
| Updated on: Oct 02, 2025 | 9:29 PM
Share

शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर झोंबरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांना संपवण्याचे प्रयत्न केले होते. याआधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख कधी असा असतो का? स्वत:च्या कार्यकर्त्यांना संपवणारा कधी पक्ष प्रमुख असूच शकत नाही. हे पक्ष प्रमुख नसून कट प्रमुख आहेत अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या खुर्चीसाठी शिवसैनिकांचा विचार केला नाही. सतत आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये यासाठी कटकारस्थानं केली. त्यांच्या अशा वागण्याने त्यांना सोडून सर्वच जण जात आहेत. एखादा माणूस चूकीचा असू शकतो. सगळेच तुम्हाला सोडून जात आहेत. ते सगळे चुकीचे आणि तु्म्हीच एकटे बरोबर असे कधी असू शकते. मला तर भिती वाटते की यांची सावली तरी यांच्याबरोबर राहणार का असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही संघावरही टीका केली.संकटाच्यावेळी धावून जाणाऱ्या संघावर तुम्ही टीका करता तुम्ही कसले हिंदुत्ववादी. मी या राष्ट्रभक्त संघटनेला शिवसेनेच्यावतीने शुभेच्छा देतो असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं आहे. रामदास भाईंनी सांगितले ते अनुभव खरेच आहेत. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणारे हे तर कटप्रमुख आहेत. हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महायुतीची सत्ता आली पाहिजे

आपण लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीची सत्ता आली पाहिजे. नाही तर मुंबई जी पुढे जात आहे, ती मागे जाईल. २५ वर्ष मागे जाईल. मुंबईची अधोगती होईल. आपण तीन वर्षात जे काम केलं. ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका आणि पंचायत समितीत भगवा फडकवा. कोण कुणाशी युती करतो, कोण कुणाशी मनोमिलन करतो याची चिंता करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची गरज नाही असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे बनून काम करायचं

लोक कामाला महत्त्व देतात. हे यश त्यामुळे मिळालं आहे. ते यश तुमचं आहे. शिवसैनिकांचं आहे. ८० जागा लढवून ६० जागा जिंकण्याचा इतिहास तुम्ही घडवला आहात. तुम्ही कार्यकर्ता आहात. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही तेच करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो. पण एकच सांगतो. तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहेत असेही आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेना शताब्दी महोत्सव जोरदार साजरा करेल

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ठाकरे टीका करतात. एक नंबरवरून ते खाली आले. तुम्ही तर घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्या सारखा रंग बदलणारा सरडा मी कधीच पाहिला नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तुमच्या सारखे आम्ही दिल्लीत मुजरे करायला जात नाही. पुरामुळे ज्यांची लग्नं रखडली असतील त्यांची जबाबदारी शिवसेना घेईल. आपण बांधिलकी म्हणून घेत आहे. माझ्याकडे दोन हात रिकामे नाही. देणारे हात आहे. पुढचं वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेना शताब्दी महोत्सव जोरदार साजरा करेल. कामाला लागा. निवडणूका नवीन नाही. शेतकरी संकटात आहे. त्यांना मदत करा असेही ते यावेळी म्हणाले.

Follow Us
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?