AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पुडी सोडतात नंतर… आपलं सरकार…उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं!

उद्धव ठाकरे यांनी कोली बांधवांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सडकून टीका केली.

आधी पुडी सोडतात नंतर... आपलं सरकार...उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं!
uddhav thackeray
| Updated on: Aug 02, 2025 | 4:46 PM
Share

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कोळी बांधवांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून ते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलंय. यावरही ठाकरेंनी शेलक्या शब्दांत टीका केली. विशेष म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकि‍र्दीचा उल्लेख करून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून मला आनंद होतो. अजूनही आपल्याला पूर्ण विजय मिळाला नाही. सरकारची नेहमीच चाल असते. आधी पुडी सोडतात, थोडक्यात पिल्लू सोडतात. जगतं की मरतं ते पाहतात. त्यानंतर आंदोलनात उतरलेल्यांना वाटतं आपण जिंकतो. आपण गाफिल राहिलो की ते पोखरत राहतात, अशी टीका ठाकरे यांनी केली.

रमी या खेळाला, उद्धव ठाकरेंचा टोला

पुढे बोलताना त्यांना त्यांनी माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या क्रीडा खात्यावरही टोला लागवला आहे. तुमच्यासमोर येण्याच्या आधी मी काही लोकांना बोलावलं होतं. तिथे म्हटलं की, सरकार टिकवण्यासाठी कुणाला तरी मंत्रिपद दिलं जातं. आज पहिल्यांदाच एका व्यक्तीला त्याच्या आवडीचं खातं दिलं. आता रमी या खेळाला दर्जा मिळणार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

कोळी बांधवांचा पाठिंबा कायम असू द्या

पुढे बोलताना ते कोळी बांधवांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही माझ्यासोबत आले आहात. आता शिवसेना तुमच्यासोबत आहे. तुम्हीच शिवसेना आहात. तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. तसेच बोलताना त्यांनी कोळी बांधवांचा पाठिंबा कायम असू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अन्यायावर तुटून पडा, असं शिवसेना प्रमुख म्हणाले होते. मी म्हणतो अन्याय तोडून टाका. अन्याय सहन करायचाच नाही, असंही ते कोळी बांधवांना उद्देसून म्हणाले. मला हा विषय आदित्यने नीट समजावून सांगितला. सरकार एका बाजूला सांगतंय भाडं भरू. भाडं घेतलं पण ज्याला द्यायचं ते दिलंच नाही. मधल्या मध्ये कुणी खाल्ले पैसे, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीवर भाष्य केलं. करोनाकाळ वाईट होता. तो जागतिक संकटाचा काळ होता. जे करायचं ते केलं. पण बऱ्याच गोष्टी केल्या नाही. आज आपलं सरकार असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आली नसती. शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांसाठीच झाली आहे, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.