AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : मालवण राजकोट किल्ल्यातील राड्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?

Uddhav Thackeray : "वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारं सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : मालवण राजकोट किल्ल्यातील राड्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?
MVA
| Updated on: Aug 28, 2024 | 1:59 PM
Share

“हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण कोर्टाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. मालवणमध्ये पुतळा कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आले. ते शिवद्रोही आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे. मालवणात राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी हा राडा घडला. राणे समर्थक मुख्य द्वारावर जमले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंची वाट अडवून धरली होती. अखेर पोलीस बंदोबस्तात दीड तासानंतर आदित्य ठाकरे खाली उतरले.

“वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारं सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “1 सप्टेंबरला दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून. गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावं अशी विनंती आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “भाजपच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली असेल असं वाटत नाही. ते शिवद्रोही होते तिथे. एकएकाला बघतो असं या शिवद्रोहींनी म्हटलं त्यांचे चेहरे समोर आले” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं, मी लक्ष ठेवतोय’

“आम्ही सरकारच्या प्रतिमेला जोडे मारणार आहोत. सरकारची महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा गडद होत आहे. कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केला होता. त्यांना तरीही हटवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं. मी लक्ष ठेवतोय. ज्यांनी बंद बेकायदेशीर ठरवला. ते भाजपवर काय कारवाई करतोय ते पाहू” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.