AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर! विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणाला किती जागा?

या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. कोणाला किती जागा? हे महायुतीच्या घटकपक्षांमध्ये ठरवलं जात आहे. दरम्यान, आता या निवडणुकीसाठी महायुतीचे संभाव्य जागावाटप समोर आले आहे

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर! विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणाला किती जागा?
mahayuti seat sharing formulaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2026 | 7:57 PM
Share

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे 16 आमदार विधानपरिषदेसाठी निवडले जाणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. कोणाला किती जागा? हे महायुतीच्या घटकपक्षांमध्ये ठरवलं जात आहे. दरम्यान, आता या निवडणुकीसाठी महायुतीचे संभाव्य जागावाटप समोर आले आहे.

महायुतीचा फॉर्म्यूला काय?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्यूला समोर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकूण 16 जागांपैकी 12 जागा या भाजपासाठी असतील. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 3 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी पक्षाला एकूण 2 जागा दिल्या जाऊ शकतात. महायुतीच्या भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही जागांची अदलाबदली होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

महाविकास आघाडीकडूनही तयारी सुरू

दुसरीकडे या जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही जोमात तयारी चालू आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणकोणत्या नेत्यांना मैदानात उतरवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्या महाविकास आघाडीत या निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे.

कुठे-कुठे होणार निवडणूक?

राज्यात एकूण सोळा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर- बीड, हिंगोली-परभणी, संभाजीनगर-जालना या सोळा जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान कधी, निकाल कधी

दरम्यान, विधानपरिषदेच्या या 16 जागांसाठी 25 मे रोजीपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. येत्या 1 जूनपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 2 जूनपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 4 जून असेल. या जागांसाठी 18 जून रोजी मतदान होईल. तर 22 जून रोजी मतमोजणी म्हणजे निकाल लागेल. या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? तसेच या निवडणुकीसाठी काय रणनीती आखली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....