AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढील 72 तास धोक्याचे, पाऊस तांडव करणार, या जिल्हांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

पुढील तीन दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, दरम्यान आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज देखील समोर आला आहे.

महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढील 72 तास धोक्याचे, पाऊस तांडव करणार, या जिल्हांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
Punjabrao DakhImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 05, 2026 | 10:06 PM
Share

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळधार पाऊस सुरू आहे. चिंतेची बाब म्हणजे आता पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुणे, मुंबईसह कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे.  मुंबईमध्ये तर पावसाने धुमाकुळ घातला आहे, पावसांची संततधार सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात पुढील 48 तासांमध्ये शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे पुण्याला देखील पाऊस झोडपून काढणार आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा देखील नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

काय आहे नवा हवामान अंदाज? 

राज्यात पुढील तीन दिवस सहा जुलै, सात जुलै आणि आठ जुलै रोजी राज्यात अतिमुसळधार पाऊस राहणार आहे, मात्र त्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिली असेल ते शेतकरी आठ जूननंतर पेरणी करू शकतात. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात या काळात रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईत अति पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी. कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, बीड, लातूर, धाराशिव जिल्हा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागातील शेतकरी देखील पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणी करू शकतात, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

शाळांना सुट्टी  

दरम्यान 6 जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, अनेक भागांमध्ये शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत