AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्षापूर्वी महाराष्ट्र छोटा होता का? तेव्हा का एकत्र आला नाही? एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर हल्ला

Eknath Shinde Speech : आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य केले आहे.

20 वर्षापूर्वी महाराष्ट्र छोटा होता का? तेव्हा का एकत्र आला नाही? एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर हल्ला
Eknath Shinde vs ThackerayImage Credit source: X
| Updated on: Jan 12, 2026 | 9:21 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य केले आहे. तसेच राज ठाकरेंवरही हल्ला केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

20 वर्षापूर्वी एक का झाला नाही? शिंदेंचा ठाकरे बंधुंना सवाल

ठाकरे बंधुंच्या युतीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढत आहेत. ते निवडणूक संपल्यावर आराम करायला कुठे जातात तुम्हाला माहीत आहे. यांना मुंबईशी काही घेणंदेणं नाही. मराठी माणसाशी घेणंदेणं नाही. वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणतात. मग 20 वर्षापूर्वी एक का झाला नाही? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही. तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता.’

काल-परवापर्यंत एकमेकांवर टीका करत होते – शिंदे

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘कालपरवा पर्यंत एकमेकांवर काय बोलला ते आठवा. स्वार्थासाठी वेगळे झाला. स्वार्थासाठीच एकत्र आला. मराठी माणसाच्या नावाने खोटं प्रेम दाखवत आहेत. हे पुतणा मावशीचं प्रेम आहे. आम्ही साडेतीन वर्षात काय केलं ते पाहा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका घेतली. तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला लोकांच्या वेदना काय कळणार…

ठाकरे बंधुंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ही लोकं विकास विरोधी आहेत. मुंबईतील पुनर्विकासाच्या कामामुळे यांना खोकला होतो म्हणे. पण वर्षानुवर्ष झोपड्यात राहणारे आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांपेक्षा यांना खोकल्याचं कौतुक. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधता आणि गोरगरीबांनी गटाराच्या बाजूला राहायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं नाही. सामान्य लोकांसाठी कोण पोटतिडकीने काम करतो हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वेदना कळणार’ असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.