AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्षापूर्वी महाराष्ट्र छोटा होता का? तेव्हा का एकत्र आला नाही? एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर हल्ला

Eknath Shinde Speech : आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य केले आहे.

20 वर्षापूर्वी महाराष्ट्र छोटा होता का? तेव्हा का एकत्र आला नाही? एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर हल्ला
Eknath Shinde vs ThackerayImage Credit source: X
| Updated on: Jan 12, 2026 | 9:21 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य केले आहे. तसेच राज ठाकरेंवरही हल्ला केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

20 वर्षापूर्वी एक का झाला नाही? शिंदेंचा ठाकरे बंधुंना सवाल

ठाकरे बंधुंच्या युतीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढत आहेत. ते निवडणूक संपल्यावर आराम करायला कुठे जातात तुम्हाला माहीत आहे. यांना मुंबईशी काही घेणंदेणं नाही. मराठी माणसाशी घेणंदेणं नाही. वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणतात. मग 20 वर्षापूर्वी एक का झाला नाही? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही. तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता.’

काल-परवापर्यंत एकमेकांवर टीका करत होते – शिंदे

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘कालपरवा पर्यंत एकमेकांवर काय बोलला ते आठवा. स्वार्थासाठी वेगळे झाला. स्वार्थासाठीच एकत्र आला. मराठी माणसाच्या नावाने खोटं प्रेम दाखवत आहेत. हे पुतणा मावशीचं प्रेम आहे. आम्ही साडेतीन वर्षात काय केलं ते पाहा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका घेतली. तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला लोकांच्या वेदना काय कळणार…

ठाकरे बंधुंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ही लोकं विकास विरोधी आहेत. मुंबईतील पुनर्विकासाच्या कामामुळे यांना खोकला होतो म्हणे. पण वर्षानुवर्ष झोपड्यात राहणारे आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांपेक्षा यांना खोकल्याचं कौतुक. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधता आणि गोरगरीबांनी गटाराच्या बाजूला राहायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं नाही. सामान्य लोकांसाठी कोण पोटतिडकीने काम करतो हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वेदना कळणार’ असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!