३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, कारवाई मागे घेऊ… संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees strike) परिवहन मंत्र्यांचा (Transport Minister) हा अल्टिमेटम आहे. पण तरीही आम्ही उद्यापर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा नागपुरातील (Nagpur) एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे. “परिवहन मंत्र्यांनी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई सरसकट मागे घ्यावी, आणि भविष्यात कारवाई करणार नाही, याची लेखी द्यावी” अशी मागणी केलीय. नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याची भूमिका घेतली आहे.