AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Kharat : यवतमाळातील पुसदमध्ये दलित समाजाला मारहाण, समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील कारला गावामध्ये दलित समाजानं बाबासाहेबांचं गाणं लग्नसमारंभात लावलं. याला विरोध करण्यासाठी काही समाजकंटकांनी दलित समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्यानंतर दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय.

Sachin Kharat : यवतमाळातील पुसदमध्ये दलित समाजाला मारहाण, समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी
समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 10:57 PM
Share

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. दलित समाज बांधवांनी लग्नसमारंभमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजवली. याला विरोध म्हणून दलित समाजाला समाजकंटकांनी जबर मारहाण केली. तसेच गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे असे समजते. आजही राज्यात डॉ. बाबासाहेब यांचे गाणं लावले म्हणून मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. समाजकंटकांना ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक करून या दलित समाजाला सुरक्षा दयावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष (National President) सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.

कारल्यात नेमकं काय घडलं

यवतमाळ जिल्ह्यातील कारला गावामध्ये दलित समाजानं बाबासाहेबांचं गाणं लग्नसमारंभात लावलं. याला विरोध करण्यासाठी काही समाजकंटकांनी दलित समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्यानंतर दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) निषेध करत आहे. ज्या समाजकंटकांनी ही मारहाण केली त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई व्हावी. हे राज्य फुले, शाहू, आंबेडकरांचं राज्य आहे. या राज्यात अशी घटना घडणं अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेकडं त्वरित लक्ष घालावं. मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून अटक करावी. दलित समाजाला पूर्णवेळ सुरक्षा द्यावी. अशी मागणी आरपीआय खरात पक्ष करत आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमागे कोण आहेत. याचा शोध पोलिसांनी घ्यावा. अशा प्रवृत्तींचा नाईनाट करावा, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.