AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे 4 वाजल्यापासून रुग्णांना तपासायचे, फक्त 2 रुपये फी घ्यायचे, गरीबांच्या डॉक्टरचं निधन, मुख्यमंत्री म्हणाले…

2 रुपयांवाले डॉक्टर डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी त्यांच्य घराबाहेर गर्दी केली. डॉ. ए.के रायारू गोपाल हे 80 वर्षांचे होते आणि त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

पहाटे 4 वाजल्यापासून रुग्णांना तपासायचे, फक्त 2 रुपये फी घ्यायचे, गरीबांच्या डॉक्टरचं निधन, मुख्यमंत्री म्हणाले…
rairu gopal
| Updated on: Aug 04, 2025 | 9:37 AM
Share

केरळमधून एक दुखद बातमी पुढे येतंय. केरळमधील कन्नूर येथील “दोन रुपयांचे डॉक्टर” यांचे निधन झालंय. त्यांनी आयुष्यभर रूग्णांवर फक्त दोन रूपयांमध्ये उपचार केले. दोन रूपये त्यांची फिस असतं. होतकरू आणि गरीब रूग्णांना ते फ्रीमध्ये गोळ्या देखील देत. डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे शनिवारी केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी त्यांच्य घराबाहेर गर्दी केली. डॉ. ए.के रायारू गोपाल हे 80 वर्षांचे होते आणि त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

विशेष म्हणजे त्यांचे दोन रूपये फिस असणारे रूग्णालय हे 2024 पर्यंत सुरू होते. त्यानंतर तब्येतीमुळे रूग्णालय बंद केले. निःस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडत त्यांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. कन्नूर येथील त्यांच्या निवासस्थानी एक छोटेसे क्लिनिक ते चालवत होते. विशेष म्हणजे ते मागच्या पाच दशकांपासून गरीब लोकांना सेवा देण्याचे काम करत होते. डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे नाव लोकांनीच दोन रुपयांचे डॉक्टर असे ठेवले होते.

डॉ. ए.के रायारू गोपाल यांच्या रूग्णालयाची खास गोष्ट म्हणजे सकाळी 4 वाजताच हे रूग्णालय सुरू होत. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत सुरू असायचे. डॉ. गोपाल हे दिवसभरात 300 पेक्षाही अधिक रूग्णांची तपासणी करत. ज्या लोकांकडे आैषधे घेण्यासाठी पैसे नसत त्यांना ते फ्रीमध्येच आैषधे देऊन घरी पाठवत. आजारी असल्यास शालेय मुले त्यांच्याकडे दाखवून मग शाळेत जात होती.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांचे वर्णन लोकांचे डॉक्टर असे केले आणि म्हटले की, इतक्या कमी शुल्कात सेवा देण्याची त्यांची तयारी गरीब रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी होती. डॉ. गोपाल यांच्या निधनाची बातमी कळताच लोक त्यांच्या घरी मोठ्या संख्येने पोहोचले होते. डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर मोठा आधार गेल्याची भावना लोकांमध्ये आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.