AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी समुहाची मोठी घोषणा, ओदिशा ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्यांच्या मुलांसाठी अशी करणार मदत

ओदिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात निराशेचे वातावरण असतानाच अदानी उद्योग समुहाने मोठी घोषणा केली आहे. अपघातातील बळीसंदर्भात महत्वाची जबाबदारी घेण्याची तयारी अदानी समुहाने दाखविली आहे.

अदानी समुहाची मोठी घोषणा, ओदिशा ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्यांच्या मुलांसाठी अशी करणार मदत
gautam_adaniImage Credit source: socialmedia
| Updated on: Jun 04, 2023 | 7:22 PM
Share

नवी दिल्ली : ओदिशाच्या बालासोर ( Odisha Train Accident )  मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृत्यूंच्या तांडवाने अख्खा देश सुन्न झाला आहे. या अपघातात 275 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार जण जखमी झाले आहेत. या अपघाताने देशभरातच नव्हे तर जगभरातून दु:ख जाहीर केले जात आहेत. अशा दुखद वातावरणात अदानी उद्योग ( Adani group ) समुहाने मोठी घोषणा केली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी ज्या निष्पाप जीवांनी आपल्या पालकांना या अपघातात गमावले आहे त्यांच्या महत्वाची जबाबदारी अदानी समुह उचललणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अदानी यांनी काय म्हटले ?

देशभरात रेल्वे अपघातातील बळींच्या आकड्याने निराशेचे वातावरण आहे. अशा वातावरणात उद्योगपती गौतम अदानी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करीत ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ओदिशा रेल्वे अपघाताने आपण व्यथित झालो आहोत. आम्ही असा निर्णय घेतला आहे की या अपघातात ज्यांनी आपल्या पालकांना गमावले आहे त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समुह उचलेल. पीडीत व्यक्तींना आधार आणि मुलांना चांगले भविष्य मिळावे ही आम्हा सर्वांची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

रेल्वेमंत्री काय म्हणाले 

ओदिशा रेल्वे अपघाताच्या प्राथमिक चौकशीत अपघाताला जबाबदार असलेल्या कारणांचा उलगडा झाला आहे. या अपघाताचा तपास रेल्वे सुरक्षा आयुक्त करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घटनास्थळी भेट दिली आहे. मदतकार्य पूर्ण झाले आहे. घटनास्थळावरुन डब्बे उचलण्यात आले आहेत. बुधवारी ( 7 जून ) सकाळ पर्यंत रेल्वे मार्ग सुरु करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवालानंतर अपघाताला जबाबदार घटकाचा उलगडा विस्तृतपणे होईल. आतापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशीत सिग्नल यंत्रणेत गफलत झाल्याचे उघडकीस आले असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु..
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....