AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदा गावातील तरूणाला सरकारी नोकरी, ध्येयवेड्या मनोजची सक्सेस स्टोरी

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण होय हे खरं आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर किशनगंज या गावातील एका तरूणाला पहिली सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आनंद साजरा केला जात आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदा गावातील तरूणाला सरकारी नोकरी, ध्येयवेड्या मनोजची सक्सेस स्टोरी
Independence day 2023 best quotesImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 21, 2023 | 11:23 PM
Share

पटना : आजकाल बहुतेक लोक सरकारी नोकरी मिळवण्यावर मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोक हवे तेवढे प्रयत्न करत असतात. त्यात सरकारी नोकरी मिळाल्यानंतर जो आनंद मिळतो तो शब्दातही कुणाला सांगता येत नाही. तर आता अशीच एक चकीत करणारी गोष्ट समोर आली आहे. एक गाव असं आहे जिथे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या इतक्या वर्षांनंतर आज पहिल्यांदा एका तरूणाला सरकारी नोकरी मिळाली आहे.

किशनगंजच्या दिघलबँक सातकौआ पंचायतीच्या कश्टोला हरिभिचट्टा गावात राहणारा मनोज कुमार सिंह यानी बीपीएससी टीआरई परीक्षा उर्तीण केली आहे. त्यामुळे आता ते पहिली सरकारी नोकरी मिळवणार आहेत. विशेष म्हणजे आपल्या गावात शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत रूजू होणारा मनोज हा पहिला तरूण ठरला आहे.

मनोज कुमार सिंह याच्या गावातील लोकांना शिक्षणाची जास्त आवड नाहीये. त्याच्या गावात आत्तापर्यंत फक्त 7 मुले पदवीधर झाली आहेत. तसंच या गावातील मुले जास्तीत जास्त 10 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेतात. त्यानंतर ते पंजाब किंवा दिल्लीला पैसे कमवण्यासाठी जातात.

दरम्यान, मनोज कुमार सिंह यांनी अशा स्थितीत 10वी पूर्ण करून कोणत्याही परिस्थिती सरकारी नोकरी मिळवायची असं ठरवलं होतं. जेणेकरून त्यांच्या गावातील तरूणांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे मनोज यानी किशनगंजमध्ये राहून दहावी आणि बारावी पूर्ण केली आणि 2011 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तर आज त्यांनी बीपीएससी टीआरई परीक्षा उर्तीण केली असून सरकारी नोकरी मिळवली आहे.

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.