AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदा गावातील तरूणाला सरकारी नोकरी, ध्येयवेड्या मनोजची सक्सेस स्टोरी

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण होय हे खरं आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर किशनगंज या गावातील एका तरूणाला पहिली सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आनंद साजरा केला जात आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदा गावातील तरूणाला सरकारी नोकरी, ध्येयवेड्या मनोजची सक्सेस स्टोरी
Independence day 2023 best quotesImage Credit source: Social Media
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 21, 2023 | 11:23 PM
Share

पटना : आजकाल बहुतेक लोक सरकारी नोकरी मिळवण्यावर मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोक हवे तेवढे प्रयत्न करत असतात. त्यात सरकारी नोकरी मिळाल्यानंतर जो आनंद मिळतो तो शब्दातही कुणाला सांगता येत नाही. तर आता अशीच एक चकीत करणारी गोष्ट समोर आली आहे. एक गाव असं आहे जिथे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या इतक्या वर्षांनंतर आज पहिल्यांदा एका तरूणाला सरकारी नोकरी मिळाली आहे.

किशनगंजच्या दिघलबँक सातकौआ पंचायतीच्या कश्टोला हरिभिचट्टा गावात राहणारा मनोज कुमार सिंह यानी बीपीएससी टीआरई परीक्षा उर्तीण केली आहे. त्यामुळे आता ते पहिली सरकारी नोकरी मिळवणार आहेत. विशेष म्हणजे आपल्या गावात शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत रूजू होणारा मनोज हा पहिला तरूण ठरला आहे.

मनोज कुमार सिंह याच्या गावातील लोकांना शिक्षणाची जास्त आवड नाहीये. त्याच्या गावात आत्तापर्यंत फक्त 7 मुले पदवीधर झाली आहेत. तसंच या गावातील मुले जास्तीत जास्त 10 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेतात. त्यानंतर ते पंजाब किंवा दिल्लीला पैसे कमवण्यासाठी जातात.

दरम्यान, मनोज कुमार सिंह यांनी अशा स्थितीत 10वी पूर्ण करून कोणत्याही परिस्थिती सरकारी नोकरी मिळवायची असं ठरवलं होतं. जेणेकरून त्यांच्या गावातील तरूणांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे मनोज यानी किशनगंजमध्ये राहून दहावी आणि बारावी पूर्ण केली आणि 2011 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तर आज त्यांनी बीपीएससी टीआरई परीक्षा उर्तीण केली असून सरकारी नोकरी मिळवली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...