AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाममध्ये ध्वजारोहन, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतही मोठ्या थाटात आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक गुरू परम पूज्य महंत स्वामी महाराज यांनी नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन जनतेला केले.

दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाममध्ये ध्वजारोहन, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!
delhi akshardham
| Updated on: Aug 15, 2025 | 8:03 PM
Share

आज भारतभरात 69 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील सर्वच शासकीय कार्यालयांवर आज तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारताला मिळालेले हे स्वातंत्र्य अमूल्य आहे. या स्वातंत्र्याचा सन्मान करूया तसेच भारताच्या विकासासाठी योगदान देऊयात असं संकल्प अनेकांनी केला. नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतही मोठ्या थाटात आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक गुरू परम पूज्य महंत स्वामी महाराज यांनी नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन जनतेला केले.

नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या स्वामीनारायण अक्षरधाम येथे 69 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अक्षरधाममध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमानंतर स्वामी महाराज यांच्याद्वारे प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे सांगितले. ‘खूप संघर्षानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. शास्त्रीजी महाराजांच्या आज्ञेनंतर योगीजी महाराजांनाही 17 वर्षांपर्यंत रोज जप केलेला आहे. अशा अनेक महाराजांचाही भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आशीर्वाद लाभलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यदिन हा आनंदाचा दिवस मानला जातो. आज दिवस हा सर्वच भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी मोठा संघर्ष केलेला आहे,’ असे यावेळी महंत स्वामी महाराज म्हणाले.

तसेच त्यामुळे या स्वातंत्र्याचा मान राखून आपण आपली सर्व कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. माझा देश मला काय देऊ शकतो याचा विचार करण्याऐवजी मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. असाच दृष्टीकोन प्रत्येकाने ठेवला तर भारत देशाची झपाट्याने प्रगती होईल. सर्वात अगोदर आपण राष्ट्र प्रथम असा विचार करून आचरण केले पाहिजे. तसेच कोणताही स्वार्थ न ठेवता एकता, सौहार्दाची भावना ठेवून आपण काम करायला हवे, अशाही भावना यावेळी महंत स्वामी महाराज यांनी व्यक्त केल्या.

तसेच त्यांनी निस्वार्थ भाव ठेवून काम करण्याची शक्ती सर्वांना मिळो. देश वेगवेगळ्या मार्गांनी समृद्ध होऊ देत, अशी प्रार्थनाही यावेळी त्यांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.