AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आधी पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, आता सर्वपक्षीय बैठक, दिल्लीत घडामोडी वाढल्या

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी याआधी कधीही न घेतलेले निर्णय घेतले आहेत.

मोठी बातमी! आधी पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, आता सर्वपक्षीय बैठक, दिल्लीत घडामोडी वाढल्या
all party meeting (संग्रहित फोटो)
| Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 10:59 PM
Share

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी याआधी कधीही न घेतलेले निर्णय घेतले आहेत. भारताने 1960 सालचा ऐतिहासिक असा सिंधू जलवाटप करारा स्थगित केला आहे. या मोठ्या निर्णयासह भारताने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतला आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये एक सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार विरोधकांना पहलगाम हल्ल्यानंरच्या भारताच्या भूमिकेची आणि पहलगाममधील सद्यस्थितीची माहिती देणार आहेत.

भारताने सिंधू जलवाटप कराराला स्थिगिती

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची बैठक 23 एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री तसेच इतर महत्त्वाचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे.

भारताने कोणकोणते निर्णय घेतले?

तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनाही परत येण्याचे आवाहन केले आहे. सरकारने अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला असून या सर्व निर्णयांचा फटका पाकिस्तानला बसणार आहे.

24 एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक

हे सर्व निर्णय घेतल्यानंतर आता पाकिस्तानची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याआधी हे निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वच पक्षांना घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली जाईल. पहलगाममध्ये सध्या काय स्थिती आहे? याची माहितीही विरोधी पक्षातील नेत्यांना दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राजनाथ सिंह हे सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा करत आहेत.

पाकिस्तान काय भूमिका घेणार?

दरम्यान, हे निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारने पहलगाममधील हल्ल्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सांगितले होते. या इशाऱ्यानंतर सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याच अपेक्षेप्रमाणे आता सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यासोबतच इतरही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात आता नेमके काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.