AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation : दोन वर्षांपासूनच्या लढाईला यश; ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले मुख्य याचिकाकर्ते? वाचा…

27 टक्के आरक्षण आम्हाला अपेक्षित आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. लोकसंख्या थोडी इकडे-तिकडे दाखवली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र आमच्या लढ्याला यश आल्याचे ते म्हणाले.

OBC Reservation : दोन वर्षांपासूनच्या लढाईला यश; ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले मुख्य याचिकाकर्ते? वाचा...
Supreme CourtImage Credit source: tv9
| Updated on: Jul 20, 2022 | 3:39 PM
Share

नवी दिल्ली : ओबीसींची लोकसंख्या (OBC Reservation) लक्षात घेऊनच निवडणुका घ्या, अशी आमची मागील दोन वर्षांपासूनची मागणी होती. आमच्या लढाईला यश मिळाले आहे. हे यश सर्व ओबीसी समाजाचे आहे, असे मुख्य याचिकाकर्ते विकास गवळी (Vikas Gawali) म्हणाले. विकास गवळी यांनी यासंबंधी टीव्ही 9ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. बांठिया आयोगाच्या अहवालात त्रुटी असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात याविषयी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान देता येवू शकणार आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के आरक्षण आम्हाला अपेक्षित आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. लोकसंख्या थोडी इकडे-तिकडे दाखवली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र आमच्या लढ्याला यश आल्याचे ते म्हणाले.

‘बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या’

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. आज महत्त्वपूर्ण सुनावणीदेखील झाली. उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा तसेच 367 ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासंबंधी याचिकाकर्ते विकास गवळी म्हणाले, की ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण तर मिळाले पाहिजेच. मात्र एससी, एसटीप्रमाणे बजेटमध्येही तरतूद असावी. आमचा हा आता पुढचा न्यायालयीन लढा असणार आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले विकास गवळी?

‘लढा सुरूच राहील’

बांठिया आयोगामध्ये ओबीसींची लोकसंख्या कमी दाखवण्यात आली आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. हा आक्षेप आम्ही लेखी स्वरुपात दिला होता. घरोघरी जाऊन ओबीसींचे प्रमाणपत्र बनवून घेतले पाहिजे आणि घोषणापत्राप्रमाणे त्यांनी उल्लेख केला पाहिजे, की मी ओबीसी आहे. जोपर्यंत अशाप्रकारे डिटेल आकडेवारी आपण घेत नाही, जोपर्यंत ओबीसींची नेमकी संख्या समजणार नाही. त्यामुळे हा असमतोल दूर करावा लागणार आहे. चार वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. आता कुठे यश मिळाले आहे, तेदेखील पूर्ण मिळालेले नाही, त्यासाठी लढा सुरूच राहील, असे विकास गवळी म्हणाले.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.