AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारात देशातील सर्वात मोठा घोटाळा, एक्झिट पोलच्या दिवशी काय घडलं?; राहुल गांधी यांनी सांगितली क्रोनॉलॉजी

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळताच काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी आज थेट शेअर मार्केटमधील घोटाळाच बाहेर काढला. देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपने केला आहे. त्याची जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) मार्फत चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शेअर बाजारात देशातील सर्वात मोठा घोटाळा, एक्झिट पोलच्या दिवशी काय घडलं?; राहुल गांधी यांनी सांगितली क्रोनॉलॉजी
| Updated on: Jun 06, 2024 | 6:01 PM
Share

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शेअर बाजारात देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. एक्झिट पोलच्या दिवशी शेअर मार्केट वाढलं आणि निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीच लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली होती. 4 जून रोजी काय होणार आहे हे भाजपला माहीत होतं. निवडणुकीचे निकाल काय येणार आहेत हे त्यांना माहीत आहेत. त्यानंतर मार्केट पडलं. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून याची जेपीसी समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा आरोप केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा उघड केला. एक्झिट पोल आल्यावर आणि आल्यानंतर शेअर मार्केट वेगाने वाढत होते. त्यामागची क्रोनोलॉजी समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जून पूर्वी शेअर खरेदी करण्यास सांगितले होते. 4 जून रोजी शेअर मार्केट गगनाला जाऊन भिडेल, असं मोदी म्हणाले होते. मोदींना वास्तव माहीत होतं. तरीही त्यांनी खोटी माहिती दिली. अमित शाह यांनीही 4 जूनपूर्वी शेअर खरेदी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मीडियाने खोटे एक्झिट पोल आला. भाजपच्या ऑफिशियल सर्व्हेत त्यांना 220 जागा मिळतील हे माहीत होतं. भाजपच्या नेत्यांना ही माहिती मिळाली होती. इंटेलिजन्सनेही भाजपला 220 जागा मिळतील असं सांगितलं होतं. पण तरीही मोदी आणि शाह यांनी खोटी माहिती देऊन शेअर खरेदी करण्यास सांगितले. कुणाचा तरी त्यांना फायदा करायचा होता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मोदी, शाह यांची चौकशी करा

मोदी आणि शाह यांच्या आवाहनानंतर 31 मे रोजी मार्केट डबलने वाढलं. त्यानंतर 3 जून रोजी मार्केट वाढतं. 4 जून रोजी मार्केट पडतं. हे कोण लोक आहेत? घपला होणार हे त्यांना माहीत होतं. हजारो कोटी रुपये या ठिकाणी गुंतवले गेले. फॉरेन गुंतवणुकदारांनीही गुंतवणूक केली. त्यानंतर 30 लाख कोटी रुपये बुडाले. रिटेल गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. हा स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठा स्कॅम आहे. निवडणुकीत किती जागा येतील हे माहीत असूनही मोदी आणि शाह यांनी शेअर खरेदी करायला लावले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची जेपीसी चौकशी झाली पाहिजे. हा मोठा घोटाळा आहे. हा गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा आहे. मोदी, शाह, एक्झिट पोल करणारे आणि परदेशी गुंतवणूकदार यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

त्यांनाच मुलाखती का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त अदानी यांच्या चॅनललाच मुलाखती दिल्या. त्या का? या सर्व गोष्टी बाहेर आल्या पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चार प्रश्नही विचारले.

राहुल गांधींचे सवाल

देशातील लोकांना गुंतवणुकीचा सल्ला का दिला?

5 कोटी लोक गुंतवणूक करतात. त्यांना स्टॉक खरेदी करण्याचा आदेश का दिला?

दोन्ही मुलाखती झाल्या. त्या अदानीच्या चॅनलला दिल्या. या चॅनल्सची सेबीची चौकशी सुरू आहे. त्या चॅनलचा मार्केट पडण्यात रोल काय?

फेक गुंतवणुकदार आणि फॉरेन गुंतवणुकदारांचा काय संबंध आहे?

128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू
128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू.
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार.
पदासाठी घेतला लेकीचा जीव, कुठं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण?
पदासाठी घेतला लेकीचा जीव, कुठं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण?.
मीरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता, मराठीप्रेमींचं आंदोलन
मीरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता, मराठीप्रेमींचं आंदोलन.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! हेलिकॉप्टर प्रवासाचं नेत्यांना टेन्शन?
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! हेलिकॉप्टर प्रवासाचं नेत्यांना टेन्शन?.
राष्ट्रवादीचं विलीनीकरण तूर्त शक्य नाही? पटेलांकडून विषयच निकाली!
राष्ट्रवादीचं विलीनीकरण तूर्त शक्य नाही? पटेलांकडून विषयच निकाली!.
तुम घाटी...बिल्डर रहेजाची मराठी लोकांना शिवी?
तुम घाटी...बिल्डर रहेजाची मराठी लोकांना शिवी?.
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.