AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : इथे पाकिस्तानकडून पीएम मोदींना SCO साठी निमंत्रण, तिथे जयशंकर यांनी फायनल काय ते सांगितलं

India-Pakistan Relation : पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SCO सम्मेलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलय. दुसऱ्याबाजूला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानबद्दलची भूमिका एकदम स्पष्टपणे सांगितली आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध भविष्यात कसे असतील? याचं उत्तर त्यात आहे.

Ind vs Pak : इथे पाकिस्तानकडून पीएम मोदींना SCO साठी निमंत्रण, तिथे जयशंकर यांनी फायनल काय ते सांगितलं
S jaishankar
| Updated on: Aug 30, 2024 | 1:42 PM
Share

पाकिस्तानात 15-16 ऑक्टोबरला SCO सम्मेलन होणार आहे. पाकिस्तान यजमान आहे. इस्लामाबादमध्ये हे सम्मेलन होईल. त्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं आहे. दुसऱ्याबाजूला एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला काही गोष्टी सरळ सुनावल्या आहेत. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच युग आता समाप्त झालय. राजधानी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन समारंभात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे विधान केलं.

“प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जम्मू-काश्मीरचा विषय असेल, तर तिथे आता अनुच्छेद 370 समाप्त झालाय. त्यामुळे मुद्दाच संपलाय. आता पाकिस्तान सोबत कसं नातं हवं हा विचार का करायचा?” असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना विचारण्यात आलं, भारत पाकिस्तानमध्ये कशा प्रकारचे संबंध असतील? त्यावर जयशंकर म्हणाले की, “मला जे म्हणायचय ते एकदम स्पष्ट आहे. आम्ही निष्क्रिय नाहीय. पाकिस्तानसोबत गोष्टी सकारात्मक दिशेने जावो किंवा नकारात्मक. आम्ही कुठल्याही परिस्थितीत उत्तर द्यायला तयार आहोत. योग्य दृष्टीकोन त्यांना दाखवावा लागेल”

झिरो टॉलरन्सच धोरण

याआधी सुद्धा परराष्ट्र मंत्री जयशंकर मे महिन्यात सीआयआयच्या एका बैठकीत बोलले होते. आधी त्यांना सीमेपलीकडून चालणारा दहशतवाद बंद करावा लागेल. भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल जयशंकर यांची भूमिका एकदम स्पष्ट आहे. दहशतवादाबद्दल भारताच झिरो टॉलरन्सच धोरण असल्यात त्यांनी अनेकदा सांगितलय. पाकिस्तानने आधी आपली प्रतिमा सुधारावी असही ते म्हणाले. बांग्लादेशच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही तिथल्या सरकारशी बोलणी करण्यास सक्षम आहोत. तिथे सत्ता परिवर्तन झालय हे मान्य करावं लागेल. तिथल्या परिस्थितीवर आमच लक्ष आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.