TMC मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भाजप सत्तेत आल्यानंतर बळीराजाचा सन्मान करणार – धर्मेंद्र प्रधान
अमित शहा यांनी ओंडा येथील जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितांचा सन्मान केला जाईन आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती दिली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच बड्या पक्षांचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. अशातच आज अमित शहा यांनी ओंडा येथील जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितांचा सन्मान केला जाईन आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती दिली. यावर केंद्रीय शिश्रणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
TMC मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ओंडा येथील जनसभेत माननीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जी वस्तुस्थिती मांडली, ती संपूर्ण बंगालमधील शेतकऱ्यांच्या वेदनेचे खरे चित्र आहे. येथील बटाटा शेतकरी स्वतःच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी झगडत आहे, कारण ममता बॅनर्जी सरकारने आपल्या अहंकारामुळे ओडिशा, झारखंडसह देशातील इतर बाजारपेठांचे दरवाजे बंगालच्या शेतकऱ्यांसाठी बंद केले आहेत. हे TMC सरकारकडून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर केलेले निर्दयी आघात आहे.
ओंडा की जनसभा में माननीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah जी ने जिस सच्चाई को उजागर किया, वह पूरे बंगाल के किसानों के दर्द की असली तस्वीर है। यहाँ का आलू किसान अपनी ही मेहनत का मूल्य पाने के लिए जूझ रहा है, क्योंकि ममता बनर्जी सरकार ने अपने अहंकार में ओडिशा, झारखंड सहित देश… pic.twitter.com/6e3OE7KD2K
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) April 11, 2026
शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणार – प्रधान
पुढे बोलताना प्रधान म्हणाले की, TMC च्या कारकिर्दीत दलालांची यंत्रणा फोफावली, आणि अन्नदाता आपल्या राज्यातच संघर्ष करत राहिला. शेतकरी शेतात घाम गाळत राहिला, पण अव्यवस्थेमुळे त्याला त्याचा हक्क मिळू शकला नाही. मात्र आता तसे राहणार नाही. माननीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, भाजप सरकार सत्तेत आल्यावर बंगालचा बटाटा ओडिशा, झारखंडसह संपूर्ण देशात पोहोचेल, शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा योग्य मोबदला मिळेल आणि त्याच्या मेहनतीचा सन्मान निश्चित केला जाईल. ही केवळ घोषणा नाही, तर बंगालच्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या पुनर्स्थापनेचा संकल्प आहे. बंगालचा शेतकरी आता अन्याय सहन करण्यासाठी नाही, तर तो संपवण्यासाठी उभा राहिला आहे.
महिलांसाठी दरमहा 3000 रुपयांची मदत दिली जाणार
पश्चिम बंगालमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये सत्ता आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा 3000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाईल, असं आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. हा निर्णय विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. याशिवाय महिलांची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता वाढवण्यावरही भर देण्यात येईल असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
