AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर; चक्की नदीवरील रेल्वे पूल पत्त्यासारखा कोसळला, अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाब (Punjab) आणि हिमाचल प्रदेशला जोडणारा रेल्वेचा चक्की पूल वाहून गेला आहे.

Monsoon Update : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर; चक्की नदीवरील रेल्वे पूल पत्त्यासारखा कोसळला, अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प
Image Credit source: ANI
| Updated on: Aug 20, 2022 | 12:44 PM
Share

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाब (Punjab) आणि हिमाचल प्रदेशला जोडणारा रेल्वेचा चक्की पूल वाहून गेला आहे. पावसाच्या जोरामुळे हा पूल चक्की नदीत पत्त्याप्रमाणे कोसळला. मात्र या मार्गावरून रेल्वे वाहतूक आधीपासूनच बंद करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित बनल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.धुव्वाधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकणी भूस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भूस्खनामुळे धर्मशाळा ते कांगडा हा मार्ग तब्बल तीन तास बंद होता. मंडी जिल्ह्यात अति पावसामुळे डोंगर कोसळल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

मोठी दुर्घटना टळली

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग धोकादायक बनले आहेत. हिमाचल प्रदेशच्या चंबा -पठानकोट महामार्गावर पावसामुळे रस्ता खचल्याने बसचा अपघात होता-होता राहिला आहे. बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.पावसामुळे अनेक राष्ट्रीय तसेच राज्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे राज्यात पूरस्थिती देखील गंभीर बनली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा इशारा

दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रुपांतर झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात मूसळधार ते मध्यमस्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा पाऊस झाल्यास याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.