AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

एका अभ्यासानुसार, भारताने 2011-12 ते 2023-24 दरम्यान गरिबी कमी करण्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गरिबीतील घट केवळ जलदच नव्हे तर सर्व श्रेणी आणि प्रदेशांमध्ये एकसारखी झाल्याचे पुढे आले आहे.

भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर
file photo
| Updated on: Dec 11, 2025 | 9:43 PM
Share

भारताची अर्थव्यवस्था जीडीपीनुसार जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था 4.19 ट्रिलियन डॉलरची आहे. साल 2025-26 मध्ये भारताची जीडीपी वृद्धीचा दर सुमारे 8.2 टक्के राहिला आहे. हा दर गेल्या वर्षी पेक्षा जास्त आहे. परंतू तरीही आपल्या देशातील जीडीपीचा दर वाढूनही गरीबी किंवा गरीबांची संख्या कमी झालेली नाही. भारतातील गरीबी संदर्भात एक अहवाल समोर आला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या संदर्भात एक ताजा संशोधनात्मक अहवाल आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि 16 व्या वित्त आयोगाचे चेअरमन अरविंद पनगढीया आणि अर्थशास्रज्ञ विशाल मोरे यांच्या अभ्यासानुसार भारताने गेल्या 12 वर्षात गरीबी कमी करण्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. अहवालानुसार भारतात 2011-12 ते 2023-24 या काळात अति दारिद्र्य जवळपास संपुष्ठात आणले आहे. जर आपण हिंदू आणि मुस्लीम समुदायांच्या गरीबीचे आकडे पाहिले तर ते धक्कादायक आहेत.

अहवाल कोणी बनवला ? कुठे प्रकाशित झाला ?

हा अभ्यास कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि 16 व्या वित्त आयोगाचे चेअरमन अरविंद पनगढीया आणि विश्लेषक विशाल मोरे यांनी तयार केला आहे. हा अहवाल Economic & Political Weekly मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार हिंदू आणि मुसलमान दोन्ही धार्मिक समुदायांत अति गरिबीचे अंतर जवळपास संपले आहे. आणि अनेक राज्यात मुसलमानांच्या गरीबीचे प्रमाण हिंदूंपेक्षा कमी आढळले आहे.

अहवालानुसार साल 2022-23 मध्ये मुसलमानांमध्ये अति-गरीबीचा दर 4% टक्के होता. आणि हिंदूमध्ये 4.8% होता. 2023-24 मध्ये मुसलमानांचा अत्यंत गरीबीचा दर घटून 1.5% आणि हिंदूंमध्ये 2.3% टक्के झाला. जागतिक बँकेच्या मते अत्यंत गरीबीचा अर्थ कोणाही व्यक्तीस रोज $3 (PPP आधारावर) उत्पन्नावर जगावे लागणे. मोरे आणि अरविंद पनगढीया यांच्यानुसार ही सीमा भारताच्या ‘तेंडुलकर गरीबी रेखा’च्या बरोबर आहे. जी भारतातील गरीबी मोजण्यासाठी आधारभूत मानली जाते.

डेटा जमा करण्यासाठी दोन मानकांचा वापर केला गेला. ज्यात Tendulkar poverty line आणि HCES सर्व्हे सारख्या मानकांचा वापर केला गेला. ज्यामुळे योग्य डेटा मिळाला आहे. तेंडुलकर गरीबी रेखा ही ते मानक आहे. ज्याआधारे कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाचा खर्च दारिद्र्य रेषेच्या वर आहे की खाली आहे हे पाहिले जाते. भारतात याचा अधिकृतपणे वापर केला जातो.दुसरा HCES म्हणजे घरगुती वापर खर्च सर्वेक्षण असून ज्यात घरोघरी जाऊन लोकांच्या खर्चाशी संबंधित माहिती गोळा केली जाते.

हिंदू आणि मुसमानात किती गरीबी घटली ?

अरविंद पनगढीया आणि विशाल मोरे यांच्या या रिपोर्टनुसार

2022-23 मुसलमानात अति दारिद्र्य 4% होते ते 2023-24 घटून 1.5% राहिले

हिंदूत साल 2022-23 हा दर 4.8% होता, तो 2023-24 मध्ये घटून 2.3% झाला

दोन्ही सुमदायात गरीबी वेगाने घटली आहे आणि दोन्हीमधील फरक जवळपास समाप्त झाला आहे.

रिपोर्टचा उद्देश्य काय होता ?

भारतात गरीबीची वास्तविक पातळी समजणे

धार्मिक समुदातील गरीबीतील फरक पाहणे

SC, ST, OBC, सामान्य वर्ग सारख्या सामाजिक श्रेणीची तुलना करणे

ग्रामीण आणि शहरी गरीबांची स्थिती समजणे

प्रत्येक राज्याचे वेगळे विश्लेषण करणे

भारतातील गरीबी घटल्याचे परिणाम –

अभ्यासाच्या नुसार साल 2011-12 ते 2023-24 दरम्यान भारताने गरीबी कमी करण्यात ऐतिहासिक प्रगती केली आहे. गरीबीत केवळ घसरणीचा वेग जास्त राहिलाच शिवाय प्रत्येक क्षेत्रात ती समान रितीने कमी झाली आहे.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?