AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

एका अभ्यासानुसार, भारताने 2011-12 ते 2023-24 दरम्यान गरिबी कमी करण्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गरिबीतील घट केवळ जलदच नव्हे तर सर्व श्रेणी आणि प्रदेशांमध्ये एकसारखी झाल्याचे पुढे आले आहे.

भारतात हिंदू जास्त गरीब कि मुसलमान ? आश्चर्यकारक आकडेवारी समोर
file photo
| Updated on: Dec 11, 2025 | 8:59 PM
Share

भारताची अर्थव्यवस्था जीडीपीनुसार जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था 4.19 ट्रिलियन डॉलरची आहे. साल 2025-26 मध्ये भारताची जीडीपी वृद्धीचा दर सुमारे 8.2 टक्के राहिला आहे. हा दर गेल्या वर्षी पेक्षा जास्त आहे. परंतू तरीही आपल्या देशातील जीडीपीचा दर वाढूनही गरीबी किंवा गरीबांची संख्या कमी झालेली नाही. भारतातील गरीबी संदर्भात एक अहवाल समोर आला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या संदर्भात एक ताजा संशोधनात्मक अहवाल आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि 16 व्या वित्त आयोगाचे चेअरमन अरविंद पनगढीया आणि अर्थशास्रज्ञ विशाल मोरे यांच्या अभ्यासानुसार भारताने गेल्या 12 वर्षात गरीबी कमी करण्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. अहवालानुसार भारतात 2011-12 ते 2023-24 या काळात अति दारिद्र्य जवळपास संपुष्ठात आणले आहे. जर आपण हिंदू आणि मुस्लीम समुदायांच्या गरीबीचे आकडे पाहिले तर ते धक्कादायक आहेत.

अहवाल कोणी बनवला ? कुठे प्रकाशित झाला ?

हा अभ्यास कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि 16 व्या वित्त आयोगाचे चेअरमन अरविंद पनगढीया आणि विश्लेषक विशाल मोरे यांनी तयार केला आहे. हा अहवाल Economic & Political Weekly मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार हिंदू आणि मुसलमान दोन्ही धार्मिक समुदायांत अति गरिबीचे अंतर जवळपास संपले आहे. आणि अनेक राज्यात मुसलमानांच्या गरीबीचे प्रमाण हिंदूंपेक्षा कमी आढळले आहे.

अहवालानुसार साल 2022-23 मध्ये मुसलमानांमध्ये अति-गरीबीचा दर 4% टक्के होता. आणि हिंदूमध्ये 4.8% होता. 2023-24 मध्ये मुसलमानांचा अत्यंत गरीबीचा दर घटून 1.5% आणि हिंदूंमध्ये 2.3% टक्के झाला. जागतिक बँकेच्या मते अत्यंत गरीबीचा अर्थ कोणाही व्यक्तीस रोज $3 (PPP आधारावर) उत्पन्नावर जगावे लागणे. मोरे आणि अरविंद पनगढीया यांच्यानुसार ही सीमा भारताच्या ‘तेंडुलकर गरीबी रेखा’च्या बरोबर आहे. जी भारतातील गरीबी मोजण्यासाठी आधारभूत मानली जाते.

डेटा जमा करण्यासाठी दोन मानकांचा वापर केला गेला. ज्यात Tendulkar poverty line आणि HCES सर्व्हे सारख्या मानकांचा वापर केला गेला. ज्यामुळे योग्य डेटा मिळाला आहे. तेंडुलकर गरीबी रेखा ही ते मानक आहे. ज्याआधारे कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाचा खर्च दारिद्र्य रेषेच्या वर आहे की खाली आहे हे पाहिले जाते. भारतात याचा अधिकृतपणे वापर केला जातो.दुसरा HCES म्हणजे घरगुती वापर खर्च सर्वेक्षण असून ज्यात घरोघरी जाऊन लोकांच्या खर्चाशी संबंधित माहिती गोळा केली जाते.

हिंदू आणि मुसमानात किती गरीबी घटली ?

अरविंद पनगढीया आणि विशाल मोरे यांच्या या रिपोर्टनुसार

2022-23 मुसलमानात अति दारिद्र्य 4% होते ते 2023-24 घटून 1.5% राहिले

हिंदूत साल 2022-23 हा दर 4.8% होता, तो 2023-24 मध्ये घटून 2.3% झाला

दोन्ही सुमदायात गरीबी वेगाने घटली आहे आणि दोन्हीमधील फरक जवळपास समाप्त झाला आहे.

रिपोर्टचा उद्देश्य काय होता ?

भारतात गरीबीची वास्तविक पातळी समजणे

धार्मिक समुदातील गरीबीतील फरक पाहणे

SC, ST, OBC, सामान्य वर्ग सारख्या सामाजिक श्रेणीची तुलना करणे

ग्रामीण आणि शहरी गरीबांची स्थिती समजणे

प्रत्येक राज्याचे वेगळे विश्लेषण करणे

भारतातील गरीबी घटल्याचे परिणाम –

अभ्यासाच्या नुसार साल 2011-12 ते 2023-24 दरम्यान भारताने गरीबी कमी करण्यात ऐतिहासिक प्रगती केली आहे. गरीबीत केवळ घसरणीचा वेग जास्त राहिलाच शिवाय प्रत्येक क्षेत्रात ती समान रितीने कमी झाली आहे.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.