AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने बांग्लादेशाच्या नांग्या ठेचल्या! थेट आर्थिक सर्जिकल स्ट्राईक; कारवाईमुळे कट्टरतावाद्यांच्या नाकाला झोंबल्या मिरच्या

Financial Surgical Strike : जिहादी, फतवेबाजांच्या हातात बांगलादेशाची सत्ता गेल्यापासून हा देश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. धर्मवेड्यांनी या देशाची अवस्था बकाल करण्यास सुरू केली आहे. त्यातच भारताला डिवचण्याचा प्रयत्न या देशाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

भारताने बांग्लादेशाच्या नांग्या ठेचल्या! थेट आर्थिक सर्जिकल स्ट्राईक; कारवाईमुळे कट्टरतावाद्यांच्या नाकाला झोंबल्या मिरच्या
भारताची बांगलादेशावर थेट कारवाईImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 11, 2025 | 9:02 AM
Share

बांगलादेशाला भारताने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या देशाची आर्थिक घडी नीट ठेवण्यासाठी सतत भरीव आर्थिक मदत दिली. पण हा देश कट्टरपंथीयांच्या हाती गेला. जिहादी, फतवेबाजांच्या हातात बांगलादेशाची सत्ता गेल्यापासून हा देश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. धर्मवेड्यांनी या देशाची अवस्था बकाल करण्यास सुरू केली आहे. त्यातच भारताला डिवचण्याचा प्रयत्न या देशाच्या चांगलाच अंगलट आला आहे. आता या धर्मवेड्यांना जगात कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ येणार आहे.

चीनमध्ये दिसला युनूस यांचा खरा रंग

अमेरिकेत सत्तापालट झाले. राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प आले. त्यांनी बांग्लादेश प्रकरणात निर्णयाचे अधिकार भारताकडे असल्याचे सूतोवाच केले. तर आर्थिक संकटांचा सामना करणारा बांग्लादेश चीनकडे मदत मागण्यासाठी गेला. सध्याचे काळजीवाहू प्रशासक मोहम्मद युनूस यांनी बीजिंग येथे भारताविरोधात गरळ ओकली. भारताचे सर्व उपकार युनूस विसरले. भारताविरोधात आगळीक केली. त्यामुळे भारताने बांगलादेशावर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक केली.

काय घेतला निर्णय?

बांग्लादेश आता व्यापारासाठी भारतीय भूमीचा वापर करू शकणार नाही. भारताने 2020 मध्ये बांगलादेशाला ट्रांसशिपमेंटची सुविधा दिली होती. त्याआधारे बांग्लादेश नेपाळ, म्यानमार आणि भूतान या देशात भारतीय भूभागाचा वापर करून त्यांच्या सामानाची निर्यात करू शकत होता. आता भारताने बांग्लादेशाची ट्रांसशिपमेंटची सुविधा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनमध्ये गेल्यावर भारतविरोधात वक्तव्य केले होते. भारताच्या पूर्वोत्तर राज्यांचा उल्लेख करत चीनने आता या भागात आर्थिक विस्तार करण्याचे आवाहन युनूस यांनी केले होते. भारताचा पूर्वोत्तर भाग हा चिकन नेक असल्याचे सूतोवाच करत चीनला याठिकाणी सुविधा मिळाव्यात म्हणून बांग्लादेशाने सीमावर्ती भागात एक विमानतळ विकसीत करण्यासाठी चीनला आमंत्रण दिले आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम दिसून आला.

थायलंडमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यात 38 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत भारताने हिंदूवरील वाढत्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली. त्याबाबत युनूस चकार शब्द बोलले नाही. त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर जोर दिला. पाकिस्तान आणि चीनमधून बांगलादेशातील कट्टरतावाद्याना आर्थिक बळ मिळत असल्याचे समोर आले आहे. भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशातील कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...