AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलाच्या नवसापोटी, पैदा केली नऊ-नऊ मुलं’, नितीश कुमार हे लय वंगाळ बोलून गेले

Nitish Kumar Personal Attack : लोकसभेच्या रणधुमाळीत तिखट शाब्दिक हल्ले सुरु आहेत. अनेक नेते एकमेकांवर घणाघात करत आहेत. तर काहींचा टीका करताना केव्हा तोल सुटतो, हे त्यांच्या पण लक्षात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा असाच तोल ढळला आहे.

'मुलाच्या नवसापोटी, पैदा केली नऊ-नऊ मुलं', नितीश कुमार हे लय वंगाळ बोलून गेले
नितीश कुमार यांची जीभ घसरली
| Updated on: May 17, 2024 | 4:36 PM
Share

लोकसभेची निवडणूक सुरु आहे. बिहारमध्ये पण निवडणुकीची धामधूम आहे. भाजपला झिडकारुन नितीश यांनी लालू यांच्या आरजेडीचा कंदिल पण हाती धरला. त्यानंतर INDIA आघाडीत हाती काहीच लागत नसल्याचे लक्षात येताच नितीश बाबू पुन्हा भाजपच्या गोटात दाखल झाले. आता त्यांचा निशाण्यावर अर्थातच राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस आहे. आता सध्या बिहारी ढंगात एकमेकांच्या उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहे. पण नितीश बाबूंचा आरोप करताना तोल ढळला आहे.

टीका करताना विसरले भान

तर शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. पण नितीश बाबू टीका करताना भान विसरले. त्यांनी थेट कुटुंबावर हल्ला केला. ” जरा सांगा तरी, कोणी इतके मुलं कुठं जन्माला घालतं का? एका मुलाच्या इच्छेने नऊ-नऊ मुलं पैदा केली. त्यांनी मला सांगितलं की, त्यांना (लालू प्रसाद यादव) मुलगा होत नव्हता, त्यामुळे त्यांनी नऊ-नऊ मुलं पैदा केली. इतकं होऊन पण त्यांना नेताजी करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत करत आहेत.” असे नितीश कुमार म्हणाले.

कुटुंबासाठी सतत चिंताग्रस्त

  • लालू प्रसाद यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना नितीश कुमार यांनी टीकेची कोणतीच मर्यादा यावेळी ठेवली नाही. नितीश कुमार हे राजकीय वर्तुळात हजरजबाबी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना नेहमी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय जीवनाचीच चिंता असते, असा आरोप केला. आपण कधीच घराणेशाही केली नसल्याचा दावा त्यांनी केला.
  • मोतिहारी येथे जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. भाजपचे नेते पण लालू प्रसाद यादव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाजीपुरा येथील जाहीर सभेत आरजेडी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या मुलाच्या राजकीय करिअरची चिंता आहे, ते तुमच्या मुलांची चिंता कशाला वाहतील असा टोला मोदींनी लगावला होता.

वाराणसीमध्ये नाही गेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे अनेक दिग्गज नेते. एनडीएमधील घटक पक्षांचे नेते, मुख्यमंत्री झाडून यावेळी उभे होते. नितीश कुमार पण जाणार होते. पण त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी ब्रेक घेतला. ब्रेक घेतल्यानंतर काल घेतलेल्या सभेत त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...