भारत आता आव्हाने टाळत नाही तर…नरेंद्र मोदींनी सांगितली नव्या भारताची भूमिका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कतर्फे आोजित करण्यात आलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (WITT) या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.

Narendra Modi In WITT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कतर्फे आोजित करण्यात आलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (WITT) या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी जगात सुरू असलेले युद्ध, या युद्धातील भारताची भूमिका, गेल्या काही वर्षांत भारतावर आलेली संकटं यावर नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना मला अनेकजण विचारतात की तुम्ही कोणासोबत आहात? परंतु आम्ही शांती, संवादासोबत आहोत. आम्ही भारताच्या हितासोबत आहोत, असे मोदी यांनी रोखठोकपणे सांगून टाकले.
सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आणि खूप गंभीर
गेल्या काही काळात मला एक दोनदा टीव्ही९ भारत वर्ष पाहण्याची संधी मिळाली. नेहमी तुमचं युद्ध आणि मिसाईलवर अधिक फोकस असतो. आज काल तर तुम्हाला कंटेटची ओव्हर फिलिंग होत आहे. मोठमोठे देश टीव्ही९ला एवढा कंटेट द्यायला तयार झाले आहेत, असे मिश्कील भाष्य मोदी यांनी केले. तसेच पण सीरिअसली सांगायचे म्हणजे जग ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहे ते अभूतपूर्व आहे आणि खूप गंभीर आहे. अशा परिस्थितीत टीव्ही९ नेटवर्कने विचारांचं एक महत्त्वाचा मंच तयार केला आहे. या समिटमध्ये तुम्ही सर्व भारत आणि जग या विषयावर चर्चा करत आहोत. तुमचं अभिनंदन करतो. या समिटसाठी तुम्हाला सदिच्छा देतो, असे म्हणत मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
भारत आता आव्हाने टाळत नाही तर…
आज जग कॉन्फ्लिक्टमुळे संभ्रमात आहे. या वादाचे दुष्प्रभाव जगावर दिसत आहेत. तेव्हा भारत आणि जगाची चर्चा करणं हे प्रासंगिक आहे. भारत आज जो देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. २०१४च्या पूर्वीची स्थिती मागे सोडून भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत आता आव्हाने टाळत नाही. तर आव्हानांचा सामना करत आहे, असेही मोदी म्हणाले.
