AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar | नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु

जनता दल यूनाइटेडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November

Bihar | नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु
| Updated on: Nov 12, 2020 | 1:51 PM
Share

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्यात एनडीएनं यश मिळवलं आहे. एनडीएनं 243 जागांपैकी 125 जागांवर तर महाआघाडीनं 110 जागांवर विजय मिळवला. जनता दल यूनाइटेडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत, मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा शपथविधी 16 नोव्हेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतली. (Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November )

भाजप आणि जेडीयूचे नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्याविषयी चर्चा सुरु असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. दोन्ही पक्षांचे नेते लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील.

नितीश कुमारचं मुख्यमंत्री

बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजपनं 74, जेडीयूनं 43 आणि इतर मित्रपक्ष मिळून 125 जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएमध्ये सर्वाधिक जागा भाजपनं मिळवल्या आहेत. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होणार असल्याचे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होतील हे स्पष्ट केले. एनडीएमधील भाजप, जेडीयू हिंदुस्तान आवाम मोर्चा, विकासशील इन्सान पार्टी यांच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. मात्र, त्याबद्दल निर्णय झालेला नाही,अशी सूत्रांची माहिती आहे.

श्रीकृष्ण सिंह यांचा विक्रम मोडण्याची संधी

श्रीकृष्ण सिंह यांच्या नावावर बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे. श्रीकृष्ण सिंह 1946 ते 1961 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना आधुनिक बिहारचा शिल्पकार असं बोललं जातं. श्रीकृष्ण सिंह हे 17 वर्षे 52 दिवस मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.

नितीश कुमार यांच्याकडे सर्वाधिक काळ मु्ख्यमंत्रीपदावर राहण्याची संधी आहे. नितीश कुमार यांनी आतापर्यंत 14 वर्षे 82 दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. तर माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे 7 वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. बिहारने आतापर्यंत 5 दिवसांपासून ते 14 वर्षापर्यंतचे मुख्यमंत्री पाहिले आहेत.

नितीश कुमार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, एका वर्षाच्या आतचं ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेससोबत आघाडी केली. यानिवडणुकीत विजय झाल्यानंतर नितीशकुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. मात्र, 2017 मध्ये नितीश कुमार यांनी राजीनामा देत पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबत  सत्ता स्थापन करत नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले.

संबंधित बातम्या :

‘जदयू’ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ‘त्यांचं’ डिपॉझिट जप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

(Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November )

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.