Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?

मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही निष्फळ ठरलीय.

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 6:34 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही निष्फळ ठरलीय. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकारही मागे हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता शेतकरी आणि केंद्र सरकारमधील पुढील बैठक 19 जानेवारीला दुपारी 12 वाजता होणार आहे (No solution in meeting between Farmers and Government over Farm Laws).

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही झाली. मात्र, ही बैठकही कोणत्याही तोडग्याविनाच संपली. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर अगदी ठाम आहेत. “सरकार आम्हाला थकवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही थकणार नाही. सरकारने तोडगा काढत कृषी कायदे रद्द न केल्यास हे शेतकरी आंदोलन 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरु राहिल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

शेतकरी आंदोलनाचा आज (15 जानेवारी) 51 वा दिवस आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील राज भवनाकडे जाणाऱ्या काँग्रेसच्या मार्चवर पोलिसांनी कारवाई केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा उपयोग केला. यावेळी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले.

संबंधित बातम्या :

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार

हरियाणातील भाजप सरकार संकटात?, जेजेपीचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.