AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे दोन तुकडे करा, PoK ला भारतात…रेवंत रेड्डीची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

Revanth Reddy on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे जनक्षोभ उसळला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानचे दोन तुकडे करा, PoK ला भारतात...रेवंत रेड्डीची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी
पाकिस्तानचे दोन तुकडे कराImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 26, 2025 | 2:59 PM
Share

पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्याविरोधात शुक्रवारी हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्याला त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना करारा जबाब देण्याचे आवाहन केले.

मोठी कारवाई करा. पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या असे रेड्डी म्हणाले. पहलगाम सारख्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णायक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1971 मध्ये बांग्लादेश निर्मिती केल्यानंतर इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा म्हणून केली होती, याची त्यांनी आठवण करून दिली.

पाकिस्तानचे दोन तुकडे करा

पाकिस्तानचे दोन तुकडे करा. पीओकेचा भारतात समावेश करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. तुम्ही दुर्गा मातेचे भक्त आहात. इंदिरा गांधी यांना आठवा आणि पाकिस्तानविरोधात कारवाई करा, असे आवाहन रेड्डी यांनी केले. पाकिस्तानविरोधात कडक पावलं टाका असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. आता कोणतीही चर्चा, करार करण्याची वेळ नाही. त्यांना जशाच तसे उत्तर द्या अशी मागणी मुख्यमंत्री रेड्डी यांनी केली होती.

असदुद्दीन ओवैसी यांचे पीएम मोदींना समर्थन

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याविषयीच्या वक्तव्याचे स्वागत आणि समर्थन केले. राष्ट्रहितासाठी आमचा पक्ष सरकारच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करा आणि दहशतवाद्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी ओवैसी यांनी केली. देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन ओवैसी यांनी केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे 26 निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...