AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर आमच्या अटींवर, आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा!

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेले संबोधित केले आहे. ते आज भारताने राबवलेल्या या मोहिमेनंतर मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला खास भेट देऊन तेथील जवानांचे मनोबल वाढवले.

...तर आमच्या अटींवर, आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा!
narendra modi
| Updated on: May 13, 2025 | 4:20 PM
Share

Narendra Modi Speech : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेले संबोधित केले आहे. ते आज भारताने राबवलेल्या या मोहिमेनंतर मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला खास भेट देऊन तेथील जवानांचे मनोबल वाढवले. सोबतच त्यांनी भारताची तसेच भारतीय सेनेच्या आगामी भूमिकेबाबतही थेट भाष्य केलं. विशेष म्हणजे यापुढे भारत दहशतवादी कारवायांना थेट आणि चोख प्रत्युत्तर देणार आहे. आम्ही आमच्या अटींवर या कारवाया करू, असं मोदी यांनी म्हटलंय.

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही

ऑपरेशन सिंदूर हे भारताचे न्यू नॉर्मल आहे. भारताने आता तीन सूत्र समोर ठेवली आहेत. यापुढे भारतावर हल्ला झाला तर भारत आपल्या शर्तींवर, आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेळेनुसार उत्तर देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे दहशतवादाचे आका आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार याला वेगवेगळं पाहणार नाही.

मोदी यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

जगदेखील भारताच्या या नव्या रुपाला, नव्या रुपाला समजून घेत पुढे जात आहे. ऑपरेशन सिंदूरचा एक-एक क्षण भारतीय सेनेच्या सामर्थ्याची सक्ष देत आहे. या काळात भारतीय सेनेची सुसूत्रता फारच चांगली होती. नौदलाने समुद्रावर आपली ताकद दाखवून दिली. भूदलाने सीमेवर लक्ष ठेवलं तर भारतीय वायूसेनेने हल्लाही केला आणि संरक्षणही केलं. बीएसएफ तसेच अन्य दलांना अद्भूत क्षमता दाखवले, असे तोंडभरून कौतुक मोदी यांनी केले.

मला भारतीय जवानांचा अभिमान

भारतीय सेनेच्या सामर्थ्याची ही ओळख झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मनुष्यबळासोबतच मिशिनींची सुसूत्रता फारच चांगली राहिलेली आहे. पाकिस्तानने लाखो प्रयत्न केले. पण आपले हवाई तळ असो किंवा अन्य सैन्य ठिकाणं यांना काहीही झालं नाही. याचं श्रेय सर्व जवानांना जात आहे. मला सर्व जनवांनाचा अभिमान आहे, असंही मोदी म्हणाले.

भारताने कारवाई फक्त स्थगित केली

भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ. हे उत्तर आमच्या अटीवर देऊ. जवानांनी धैर्य असंच कायम ठेवावे. आपल्याला कायम सावध आणि तयार राहिलं पाहिजे, अशा सूचना मोदी यांनी भारतीय जवानांना दिल्या.

Follow Us
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.