AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘5 दशकं गरिबी हटावचे नारे ऐकले पण आता…’, पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार असं मोदी यांनी म्हटलं आहे.

'5 दशकं गरिबी हटावचे नारे ऐकले पण आता...', पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा
| Updated on: Feb 04, 2025 | 6:02 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार, काही नेते गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करतात, पाच दशकं देश गरिबी हटावचा नाराच ऐकत होता’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी?

काही नेते गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करतात, फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार. देशानं पाच दशक गरिबी हटावचे नारे ऐकले. दिल्लीतून एक रुपया निघायचा तर 15 पैसे गरिबांना मिळायचे. मात्र आम्ही खोट्या घोषणा न देता खरा विकास केला. बचत आणि त्यातून विकास हे आमच्या सरकारचं मॉडेल आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये 25 कोटी जनता गरिबीमधून बाहेर आली, असा दावा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही खोट्या घोषणा न देता खरा विकास केला आहे. तीन लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवले, दहा कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं आम्ही हटवली.  बचत आणि विकास हेच आमच्या सरकारचं मॉडेल आहे. पूर्वी दिल्लीतून एक रुपया निघाला की गरिबांच्या हातात केवळ 15 पैसे पडायचे, पण आता गरिबांच्या खात्यात थेट पैसा जमा होत आहे. प्रत्येक घरात नळानं पाणी पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मोदींनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं. जास्त ताप आल्यावर लोक काहीही बोलतात, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर केला आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली, आता या टीकेला काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.