AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एक मताने पडले होते वाजपेयी सरकार, कोण होता तो खासदार ज्याच्यावर उठली टीकेची झोड?

अटल बिहारी वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. पण त्यांचा कार्यकाळ हा खूपच कमी काळ राहिला, त्यापैकीच एक म्हणजे त्यांचा १३ महिन्यांचा कार्यकाळ. फक्त एका मतामुळे त्यांचं सरकार पडलं होतं. एका खासदाराने वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केल्याने हे सरकार पडलं होतं.

फक्त एक मताने पडले होते वाजपेयी सरकार, कोण होता तो खासदार ज्याच्यावर उठली टीकेची झोड?
| Updated on: May 18, 2024 | 5:00 PM
Share

Ayal Bihari Vajpayee : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान झाले. परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवस होते. दुसरा कार्यकाळ केवळ 13 महिने टिकला. फक्त एका मताने त्यांचं सरकार पडलं होतं. त्यामुळे त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 13 महिन्यांचा होता.

कोण होता तो खासदार

अटल बिहारी वाडपेयी यांचे सरकार पडण्यासाठी ज्या खासदारांना जबाबदार मानले जाते ते म्हणजे ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गोमांग यांना. कारण त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केले होते. लोकसभेत सरकारच्या बाजूने २६९ मते पडली होती. गिरधर गोमांग यांनी विरोधात मतदान केल्याने विरोधकांची मतांची संख्या 270 झाली. त्यामुळे फक्त एक मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पण भाजपला 182 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

गोमांग यांच्यावर टीकेची झोड

गिरधर गोमांग यांना तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांनी त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे मतदान करण्याची परवानगी दिली होती. फेब्रुवारीमध्ये गोमांग हे ओडिशाचे मुख्यमंत्री बनले होते, परंतु त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला नव्हता. मतदानाच्या दिवशी सभागृहात ते उपस्थित होते आणि त्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही खासदार म्हणून मतदान केल्याने गोमांग यांच्यावर बरीच टीकाही झाली होती.

जेव्हा राष्ट्रपतींनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले

1998 मध्ये भाजपने विविध पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केले होते. जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्षाने देखील भाजपला पाठिंबा दिला होता. पण 13 महिन्यांनंतर AIADMK ने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होते. यानंतर वायपेयी यांचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.

सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे होते. सरकारने प्रयत्न सुरु केले. त्यावेळी सरकारला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. पण जेव्हा मतदान झाले तेव्हा निकास धक्कादायक लागला. वाजपेयी सरकार केवळ एका मताच्या फरकाने बहुमत मिळवू शकले नाही. .

महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ही केंद्रातील वाजपेयी सरकारची सहयोगी होती. त्यांनी संसदेत सरकारच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केली होती, परंतु पक्षाचे एक खासदार सैफुद्दीन सोज यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन सरकारच्या विरोधात मतदान केले. अटल सरकार पडण्यामागे हेही एक प्रमुख कारण मानले जात होते. एका मताने अटल सरकार पाडणारे गिरीधर गोमांग यांनी 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.