AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EC Decision on NCP | निवडणूक आयोगाचा निकाल येताच शरद पवार गटाने घेतला महत्त्वाचा निर्णय

EC Decision on NCP | दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने ही सुनावणी सुरु होती. अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते.

EC Decision on NCP | निवडणूक आयोगाचा निकाल येताच शरद पवार गटाने घेतला महत्त्वाचा निर्णय
SHARAD PAWAR VS AJIT PAWAR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 07, 2024 | 8:42 AM
Share

नवी दिल्ली (संदीप राजगोळकर) | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होती. निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतिक्षा होती. निवडणूक आयोग काय निकाल देणार? याची उत्सुक्ता होती. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण शरद पवार राजकारणात आजही सक्रीय आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग शिवसेनेपेक्षा वेगळा निकाल देणार का? याकडे सगळ्यांच लक्ष होतं. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेसारखाच निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि नेत्यांचा एक गट शिवसेना-भाजपा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. त्याचवेळी शरद पवार गट विरोधी बाकांवर बसला. दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने ही सुनावणी सुरु होती.

अखेर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालय. शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी अर्ज करायला निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिले असताना हा निर्णय आलाय. याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. अजित पवार गट अधिकृत पक्ष असल्याने त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाला नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभेतील बहुमत हे अजित पवार गटाच्या बाजूने होतं. तेच निर्णायक ठरलं.

शरद पवार गटाचा एक महत्त्वाचा निर्णय

दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी वकिलांशी चर्चा केली. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत शरद पवारांनी फोनवरून चर्चा केली. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. आता सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असेल? त्यावरही बरच काही अवलंबून आहे.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.