AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thackeray : देशात NRC लागू केलंय का? उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर तोफ डागली, काय केला आरोप

Udhav Thackeray : देशात अघोषीत एनआरसी लागू केल्याचा थेट हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. बिहार निवडणुकीतील मतदार याद्यांबाबत त्यांनी निशाणा साधला. त्यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय निवडणूक आयोगावर तुफान हल्लाबोल केला.

Udhav Thackeray : देशात NRC लागू केलंय का? उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर तोफ डागली, काय केला आरोप
उद्धव ठाकरे
| Updated on: Aug 07, 2025 | 11:41 AM
Share

देशात अघोषीत एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) लागू केला आहे का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. बिहार निवडणुकीतील मतदार याद्यांबाबत आणि ईव्हीएमवरून त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर सरकारव तोफ डागली.

देशात अघोषित एनआरसी?

प्रत्येक राज्याच्या निवडणुका वेळेनुसार होतील. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला. स्वतची ओळख मतदारांनी पटवून द्यायची असं त्यात आहे. म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झाला का. सीए आणि एनआरसी चा विषय पेटला होता. दिल्लीत त्यावर आंदोलन झालं होतं. तुम्ही तुमची ओळख पटवून द्या असं म्हटलं होतं. त्यामुळे वाद झाला होता. आता निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी खडसावलं.

मग ईव्हीएमचे व्हीव्हीपॅट का काढलं?

ईव्हीएम वर आक्षेप असताना व्हीव्हीपॅट काढलं, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अपारदर्शकता आणलं. मग निवडणूक घेता कशाला. यांचे एवढे निवडून आले ते थेट जाहीर करा. आमचं मत आम्हाला कळत नाही. रजिस्टर कुठे होतं हे कळत नाही. बॅलेट पेपरवर मतदान करताना ठसा लावल्यानंतर माझं मत कुठे आहे कळायचं. आता व्हीव्हीपॅट काढलं जात आहे. मग निवडणूक घेताच कशाला, असा अचूक निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.

देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्याची गरज

कोण मित्र आणि कोण दुश्मन हे ठरवलं पाहिजे. मित्र कोणी राहिले नाही. जगात अशी जागा नाही तिथे मोदी गेले नाही. पाकिस्तानसोबत आपला संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानला चीन मदत करत आहे हे उघड झालं आहे. मध्यंतरी चायना बायकॉट केलं होतं. मग आता का जात आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहे. माता भगिनींचं कुंकू पुसलं त्यांचं अमित शाह आणि मोदी काय उत्तर देणार. देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्याची देशाला गरज आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत लगावला. मणिपूर आजही जळत आहे. हे लोक फक्त पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत. देशाला मजबूत पंतप्रधान आणि गृहमंत्र्याची गरज आहे. कोणतंही संकट आल्यावर हे दोघे गायब होतात, असा जोरदार टोला ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत आहेत. ते आज राहुल गांधी यांची भेट घेतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.