AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी लावली मणिपूरमध्ये आग, राज्यसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कडाडल्या

कॉंग्रेस शासित राज्यातील महिला बलात्कारावर बोलण्याचे धाडस तुमच्यात आहे का? जर ते या घटनांवर बोलू शकत नाहीत तर त्यांनी महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी लावली मणिपूरमध्ये आग, राज्यसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कडाडल्या
smriti irani Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 26, 2023 | 10:21 PM
Share

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूर प्रकरणात कॉंग्रेस सदस्याच्या प्रश्नावर प्रचंड संताप व्यक्त करीत कॉंग्रेस मणिपूर हिंसे मागील सत्य दडपत असल्याचा आरोप केला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये आग लावल्याचाही आरोप स्मृती इराणी यांनी केला. संसदेत प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी कॉंग्रेसवर तिखट शब्दात वार केले.

कॉंग्रेसचे सदस्य खासदार अमी याग्निक यांनी महिला मंत्री मणिपूर घटनेवर का बोलत नाहीत असा आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यावर अत्यंत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिले. अमी याग्निक यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत राज्यसभेत पूरक प्रश्न विचारताना महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महिला सहकारी मणिपूर मु्द्द्यावर गप्प का ? यावर स्मृती इराणी भडकल्या. त्यांनी म्हटले की यावर माझा तीव्र आक्षेप आहे. केवळ महिला मंत्री नव्हे तर महिला राजकीय नेत्यांनी मणिपूर सोबतच छत्तीसगड, राजस्थान तसेच बिहारमध्ये होणाऱ्या घटनांवरही लक्ष केंद्रीत करायला हवे. या राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर ते बोलण्याचे धाडस दाखवू शकतात काय ? असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी मणिपूरला गेल्यानंतरच…

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही छत्तीसगड बद्दल बोलाल,राजस्थानातील बिहारमधील घटनांवर बोलाल, तुमच्यात लाल डायरीबद्दल बोलण्याचे धाडस आहे का ? त्यांच्यात हे बोलण्याचे धाडस आहे का की एक कॉंग्रेसचा नेता तेथे गेल्यानंतर मणिपूर जळू लागले. यह बोलण्याचे धाडस आहे का की राहुल गांधी मणिपूरला गेल्यानंतरच तेथे हिंसा वाढू लागली असा जोरदार प्रहार स्मृती इराणी यांनी यावेळी करीत संसद दणाणून सोडली.

तरच तुम्हाला अधिकार 

कॉंग्रेस शासित राज्यातील महिला बलात्कारावर बोलण्याचे धाडस तुमच्यात आहे का? जर ते या घटनांवर बोलू शकत नाहीत तर त्यांनी महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये असेही त्या म्हणाल्या. लोकसभेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मणिपूर प्रकरणावर सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर बोलण्यास तयार असल्याचे पत्र दोन्ही सभागृहांच्या विरोधी नेत्यांनी लिहीले आहे. या प्रकरणी सौहार्दात्मक चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.