AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : या राज्यात पाऊसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा तो अंदाज काय? अनेक शहरातील रस्त्यांवर महापूर

Weather Update : मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे. येत्या 24 तासांत देशातील या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महापुराने गावांचा संपर्क तुटला आहे. तेव्हा घराबाहेर पडताना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.

Weather Update : या राज्यात पाऊसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा तो अंदाज काय? अनेक शहरातील रस्त्यांवर महापूर
पावसाचे थैमान
| Updated on: Aug 19, 2025 | 8:58 AM
Share

Today Weather Update : देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोपडून काढले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक वाहनं या पुरात बुडाल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात तर पावसाने हाहा:कार माजवला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. 19 ऑगस्ट 2025 पर्यंत दक्षिण ओडिसा ते आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य भारताला पावसाचा मोठा फटका बसणार आहे. मध्य भारतात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये पावसाचे धुमशान

दिल्ली NCR मध्ये 24 तासात तापमानात मोठा फरक दिसला नाही. पण गेल्या 24 तासात अनेक जागांवर तुफान पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार, 19 ऑगस्ट 2025 रोजी अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागात ढगांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे. तर या काळात दिल्ली आणि एनसीआरमध्ये कमाल तापमान 33 डिग्री सेल्यियस आणि किमान तापमान 25 डिग्री सेल्यियस असेल.

महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाचे थैमान

उत्तर-पूर्व राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, 20-24 ऑगस्ट 2025 या काळात नागालँड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयामध्ये पावसाचे थैमान दिसेल. तर पश्चिम भारतात महाराष्ट्र, गोवा आणि कोंकणाला जोरदार पावसाचा फटका बसेल. 18-19 ऑगस्ट रोजी तुफान पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. गुजरातला 19-20 ऑगस्ट 2025 या काळात पावसाचा फटका बसेल.

महाराष्ट्रात सर्वदूर मुसळ’धार’

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या चार दिवसात तर पावसाने कहर केला आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाचा फटका बसला. मध्यरात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी,विलेपार्ले,गोरेगाव, मालाड,बोरिवली, कांदिवली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग दिसली. अनेक सखल भागात पाणी साचले. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. मुंबई आणि नवी मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. येत्या 12 तासात या भागाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.