AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटबंदी करण्यात आली तेव्हा देशात किती रुपये शिल्लक होते? चिदंबरम यांचा युक्तिवाद काय? सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडून कोर्टात युक्तिवाद करताना म्हणाले, ' केंद्र सरकार स्वतःहून नोटांसंबंधी कोणताही प्रस्ताव आणू शकत नाही.

नोटबंदी करण्यात आली तेव्हा देशात किती रुपये शिल्लक होते? चिदंबरम यांचा युक्तिवाद काय? सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 24, 2022 | 12:09 PM
Share

संदीप राजगोळकर,  नवी दिल्लीः नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी जाहीर केलेली नोटबंदी योग्य होती की अयोग्य यासंबंधीचा महत्त्वाचा खटला सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु आहे. आज या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांच्याकडून महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला. चिदंबरम यांनी कोर्टासमोर महत्त्वाची आकडेवारी सादर केली. नोटबंदी केली, त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था कशी होती, याची स्थिती त्यांनी सांगितली. 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी भारतीय चलनात 17.97 लाख कोटी रुपये होते. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 15.44 लाख कोटी होत्या. ज्यावेळी नोटबंदी करण्यात आली त्यावेळी देशाकडे फक्त 2 लाख कोटी शिल्लक होते, जे देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी पुरेसे नव्हते, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.

एस अब्दुल नजीर, बीआर गवई, एएस बोपण्णा, व्ही रामसुब्रमण्यम आणि बीव्ही नागरथना जेजे यांचा समावेश असलेल्या संविधानपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडून कोर्टात युक्तिवाद करताना म्हणाले, ‘ केंद्र सरकार स्वतःहून नोटांसंबंधी कोणताही प्रस्ताव आणू शकत नाही, जीडीपी जसजसा वाढेल तसतसे लोकांचे उत्पन्न वाढेल. चलनाचीही गरज वाढते. अर्थव्यवस्थेत किती रोख रकमेची गरज आहे हे ठरवण्याचा हा अधिकार आरबीआयला देण्यात आला आहे. सरकारला नाही…

नोटबंदी कधी करतात, तर जेव्हा चलन अर्थहीन होते किंवा अतिपुरवठा होतो तेव्हा… 10 हजार रुपयाचे चलन अर्थहीन होते. 1968 मध्ये 1000 च्या नोटाही दुर्मिळ होत्या. 100 ची नोट असणंही श्रीमंताचं लक्षण होतं. 1946 आणि 1978 मध्येही उच्च मूल्याच्या नोटांवर बंदी आणली गेली. एस 26(2) नियमानुसार कोणत्याही (Any) नोटांची मालिका बंद करणे याचा अर्थ सर्व (All)असा लावू नये. 1946, 1978 आणि 2016 च्या सरकारांना सारखेच अधिकार आहेत. पण 2016  च्या पूर्वी कुणीही असा कायदा पारीत केला नाही. मात्र तत्कालीन मोदी सरकारने हा निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचवली, असा युक्तिवाद पी चिदंबरम यांनी केला.

Follow Us
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया