AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या धमकीने अंडरवर्ल्डही घाबरलं, पुन्हा पंगा घेतला नाही.. नेमकं काय घडलं?

धर्मेंद्र यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला, पण प्रत्येक वेळी विजय त्यांचाच झाला. अंडरवर्ल्डलाही त्यांच्याशी पंगा घेणं टाळावं लागलं. जेव्हा धर्मेंद्र यांचा अंडरवर्ल्डच्या लोकांशी सामना झाला, तेव्हा त्यांनी सर्वांसमोर धमकी दिली. त्यानंतर अंडरवर्ल्डने त्यांच्याशी पंगा घेणं टाळलं. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी धर्मेंद्र यांच्या शौर्याचे अनेक किस्से सांगितले.

| Updated on: Oct 27, 2025 | 6:46 PM
Share
धर्मेंद्र केवळ पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही 'हीमॅन' होते. त्यांच्या साहसाचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी नुकतेच बॉलिवूडच्या या 'हीमॅन'चे अनेक किस्से सांगितले. त्यामधील अंडरवर्ल्डही त्यांच्याशी पंगा घेण्यापासून कसं दूर राहायचं हे सांगितलं आहे.

धर्मेंद्र केवळ पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही 'हीमॅन' होते. त्यांच्या साहसाचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी नुकतेच बॉलिवूडच्या या 'हीमॅन'चे अनेक किस्से सांगितले. त्यामधील अंडरवर्ल्डही त्यांच्याशी पंगा घेण्यापासून कसं दूर राहायचं हे सांगितलं आहे.

1 / 8
जेव्हा सिनेमात अंडरवर्ल्डचा प्रभाव होता, तेव्हा धर्मेंद्र यांचा त्यांच्याशी वाद झाला होता. पण त्यांचं कुटुंब अंडरवर्ल्डपासून कधीच घाबरलं नाही. सत्यजीत पुरी यांनी शुक्रवार टॉकीजवर बोलताना सांगितलं, "त्या काळात अंडरवर्ल्ड खूप मजबूत होतं. जेव्हा अंडरवर्ल्ड एखाद्या अभिनेत्याला फोन करायचं, तेव्हा ते घाबरायचे. पण धरमजी आणि त्यांचं कुटुंब त्यांना कधीच घाबरलं नाही."

जेव्हा सिनेमात अंडरवर्ल्डचा प्रभाव होता, तेव्हा धर्मेंद्र यांचा त्यांच्याशी वाद झाला होता. पण त्यांचं कुटुंब अंडरवर्ल्डपासून कधीच घाबरलं नाही. सत्यजीत पुरी यांनी शुक्रवार टॉकीजवर बोलताना सांगितलं, "त्या काळात अंडरवर्ल्ड खूप मजबूत होतं. जेव्हा अंडरवर्ल्ड एखाद्या अभिनेत्याला फोन करायचं, तेव्हा ते घाबरायचे. पण धरमजी आणि त्यांचं कुटुंब त्यांना कधीच घाबरलं नाही."

2 / 8
धर्मेंद्र यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांना सांगितलं होतं, "जर तुम्ही आलात, तर संपूर्ण साहनेवाल पंजाबमधून येईल. तुझ्याकडे १० लोक आहेत, पण माझ्याकडे एक सैन्य आहे. मी एकदा बोललो की, ट्रक भरून पंजाबमधून लढायला येतील. माझ्याशी पंगा घेऊ नको." आणि त्यानंतर त्यांनी कधीच धर्मेंद्र यांच्याशी पंगा घेतला नाही.

धर्मेंद्र यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांना सांगितलं होतं, "जर तुम्ही आलात, तर संपूर्ण साहनेवाल पंजाबमधून येईल. तुझ्याकडे १० लोक आहेत, पण माझ्याकडे एक सैन्य आहे. मी एकदा बोललो की, ट्रक भरून पंजाबमधून लढायला येतील. माझ्याशी पंगा घेऊ नको." आणि त्यानंतर त्यांनी कधीच धर्मेंद्र यांच्याशी पंगा घेतला नाही.

3 / 8
धर्मेंद्र यांनी एकदा एका हल्लेखोराला एका मिनिटात सरळ केलं होतं. सत्यजीत यांनी सांगितलं, "एकदा एका चाहत्याने धर्मेंद्र यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि धर्मेंद्र यांनी त्याला एका मिनिटात सरळ केलं. आजकाल अभिनेते सहा गनमॅन आणि इतर लोकांसोबत फिरतात, पण त्या काळात धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासारखे अभिनेते मोकळेपणाने फिरायचे."

धर्मेंद्र यांनी एकदा एका हल्लेखोराला एका मिनिटात सरळ केलं होतं. सत्यजीत यांनी सांगितलं, "एकदा एका चाहत्याने धर्मेंद्र यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि धर्मेंद्र यांनी त्याला एका मिनिटात सरळ केलं. आजकाल अभिनेते सहा गनमॅन आणि इतर लोकांसोबत फिरतात, पण त्या काळात धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासारखे अभिनेते मोकळेपणाने फिरायचे."

4 / 8
सत्यजीत पुरी यांनी हेही सांगितलं की, धर्मेंद्र यांनी एकदा आपल्या शारीरिक ताकदीने केवळ स्वतःचाच नव्हे, तर घोड्याचाही अपघात टाळला. ते म्हणाले, "धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्यापेक्षा साहसी कोणी नाही. मी 'गुलामी' चित्रपटात त्यांचा असिस्टंट होतो. एका शॉटदरम्यान एका घोड्याला महालाच्या संगमरवरी पायऱ्यांवर चढायचं होतं. धरमजींसाठी डुप्लिकेट तयार होता, पण त्यांनी स्वतःच तो सीन करण्याचा आग्रह धरला. त्यांनी फक्त घोड्याभोवतालचा परिसर साफ करण्यास सांगितलं."

सत्यजीत पुरी यांनी हेही सांगितलं की, धर्मेंद्र यांनी एकदा आपल्या शारीरिक ताकदीने केवळ स्वतःचाच नव्हे, तर घोड्याचाही अपघात टाळला. ते म्हणाले, "धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्यापेक्षा साहसी कोणी नाही. मी 'गुलामी' चित्रपटात त्यांचा असिस्टंट होतो. एका शॉटदरम्यान एका घोड्याला महालाच्या संगमरवरी पायऱ्यांवर चढायचं होतं. धरमजींसाठी डुप्लिकेट तयार होता, पण त्यांनी स्वतःच तो सीन करण्याचा आग्रह धरला. त्यांनी फक्त घोड्याभोवतालचा परिसर साफ करण्यास सांगितलं."

5 / 8
सत्यजीत पुढे म्हणाले, "पण घोड्याने तिथे मूत्रविसर्जन केलं आणि कोणीही हे पाहिलं नाही. पायऱ्या निसरड्या झाल्या. धर्मेंद्र जी घोड्यावर बसताना पाय रकाब किंवा फुटरेस्टमध्ये ठेवत नाहीत. ते घोडा फ्रीस्टाइल चालवतात. पण जेव्हा घोडा चढला, तेव्हा तो घसरला आणि मी पाहिलं की, धरमजींनी त्यांचा डावा पाय जमिनीवर आपटला आणि घोडा उभा राहिला."

सत्यजीत पुढे म्हणाले, "पण घोड्याने तिथे मूत्रविसर्जन केलं आणि कोणीही हे पाहिलं नाही. पायऱ्या निसरड्या झाल्या. धर्मेंद्र जी घोड्यावर बसताना पाय रकाब किंवा फुटरेस्टमध्ये ठेवत नाहीत. ते घोडा फ्रीस्टाइल चालवतात. पण जेव्हा घोडा चढला, तेव्हा तो घसरला आणि मी पाहिलं की, धरमजींनी त्यांचा डावा पाय जमिनीवर आपटला आणि घोडा उभा राहिला."

6 / 8
या घटनेनंतर धर्मेंद्र इतके संतापले होते की, त्यांनी चित्रपटाच्या असिस्टंटला मारण्यासाठी शोधलं. ते म्हणाले, "ते त्या क्षणी इतके संतापले होते की, त्यांनी आधी असिस्टंटची कॉलर पकडली, पण तो निसटला. मग ते घोड्याला मारण्यासाठी गेले, पण स्वतःला थांबवलं. त्या एका सेकंदात धर्मेंद्र यांच्याभोवती कोणीही नव्हतं. सगळे पळाले."

या घटनेनंतर धर्मेंद्र इतके संतापले होते की, त्यांनी चित्रपटाच्या असिस्टंटला मारण्यासाठी शोधलं. ते म्हणाले, "ते त्या क्षणी इतके संतापले होते की, त्यांनी आधी असिस्टंटची कॉलर पकडली, पण तो निसटला. मग ते घोड्याला मारण्यासाठी गेले, पण स्वतःला थांबवलं. त्या एका सेकंदात धर्मेंद्र यांच्याभोवती कोणीही नव्हतं. सगळे पळाले."

7 / 8
धर्मेंद्र यांनी इतक्या धोकादायक परिस्थितीतून गेल्यानंतरही स्वतःपेक्षा घोड्याची जास्त काळजी दाखवली. सत्यजीत शेवटी म्हणाले, "शांत झाल्यावर त्यांनी घोड्याच्या मालकाला २०० रुपये दिले, कारण घोडा पडला होता आणि त्याला काही जखमा झाल्या असतील. ते घोड्याची काळजी करत होते, स्वतःची नाही."

धर्मेंद्र यांनी इतक्या धोकादायक परिस्थितीतून गेल्यानंतरही स्वतःपेक्षा घोड्याची जास्त काळजी दाखवली. सत्यजीत शेवटी म्हणाले, "शांत झाल्यावर त्यांनी घोड्याच्या मालकाला २०० रुपये दिले, कारण घोडा पडला होता आणि त्याला काही जखमा झाल्या असतील. ते घोड्याची काळजी करत होते, स्वतःची नाही."

8 / 8
Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.